AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्याला होणार नाही नुकसान

हिवाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण थंडीमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे ते आजारी पडू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घेण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात अशा प्रकारे घ्या पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्याला होणार नाही नुकसान
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 5:37 PM
Share

हिवाळा येताच खाण्यापिण्यापासून कपड्यांपर्यंत सर्व काही बदलण्याची गरज असते. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण त्याचबरोबर जनावरांनाही थंडीपासून वाचवणं गरजेचं आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात कुत्रे किंवा मांजर असे पाळीव प्राणी असतात. घरात असलेल्या त्या प्राण्याची काळजी घेणे ही देखील आपली जबाबदारी आहे. कारण थंडीमुळे त्यांच्या शारीरिक स्थितीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तुमच्या घरात कुत्रे किंवा मांजरीसारखे पाळीव प्राणी असतील तर या वेळी त्यांची काळजी घ्यावी. पण थंडीचा परिणाम त्यांच्या शरीरावरही पडतो. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या जनावराची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

जागेची काळजी घ्या

थंडीपासून बचाव करण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठी उबदार आणि आरामदायक जागा निवडा. विशेषत: रात्री जेव्हा थंडी असते. त्यांना अशा ठिकाणी ठेवा जिथे ते थंडीपासून सुरक्षित राहतील. यासोबतच तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या जागेवर ब्लँकेट किंवा उबदार चादर ठेवू शकता.

स्वेटर आणि जॅकेट

तुमच्या कडील कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना कपडे घालू शकता. या पाळीव प्राण्यांना स्वेटर आणि जॅकेटसारखे उबदार कपडे आपल्याला बाजारात किंवा ऑनलाइन सहज मिळतात. विशेषत: जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जात तेव्हा त्यांना कपडे घाला. यामुळे त्यांच्या त्वचेचे आणि शरीराचे थंडीपासून बचाव होईल.

जमिनीवर झोपू देऊ नका

हिवाळ्यात आपल्या घराची फरशी थंड असते, म्हणून पाळीव प्राण्यांना थंड जमिनीवर झोपण्यापासून प्रतिबंधित करा, कारण यामुळे त्यांचे सांधे आणि हाडे खराब होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटा सा पलंग ठेवा किवा त्यांचा झोपण्याच्या ठिकणी चादर ब्लँकेट वेगळा ठेवा. त्यांचा पलंग नेहमी उंचीवर ठेवा जेणेकरून ते थंडीपासून वाचू शकतील.

मॉइश्चरायझिंग आणि साफसफाई

पाळीव प्राण्यांची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यांचे विशेष मॉइश्चरायझर वापरू शकता. तुम्हाला हे पाळीव प्राण्यांच्या पेट शॉप व स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन सहज सापडेल. त्याचबरोबर त्यांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. त्यांचे कपडे आणि पलंग स्वच्छ ठेवा. पाळीव प्राण्यांना हिवाळ्यात आंघोळीची फारशी गरज नसते, पण ते घाण झाले तर त्यांना अंघोळ घालावी लागते. तुम्ही 2 ते 3 दिवसांनंतर त्यांना अंघोळ घालण्याची वेळ सेट करू शकता. यासाठी जास्त गरम किंवा थंड पाण्याचा वापर करू नये.

पाळीव प्राण्यांना हिवाळ्यात पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित करा, कारण थंड हवामानात ते कमी पाणी पिऊ शकतात. तसेच बदलत्या ऋतूनुसार त्यांना खाऊ घालावे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.