AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालादेखील ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येते? मग वापरा या सोप्या टिप्स

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर तुम्ही देखील डुलक्या मारता का? काहीही केल्या झोप अनावर होत नाही? मग या सोप्या टिप्स वापरा

तुम्हालादेखील ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येते? मग वापरा या सोप्या टिप्स
जेवणानंतरचा सुस्तपणा Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 30, 2022 | 6:36 PM
Share

मुंबई, जेवल्यानंतर बऱ्याच जणांना सुस्तपणा (lethargy) जाणवतो आणि बहुतेक लोकांना काही काळ विश्रांती घेण्यासारखे वाटते. अर्थातच घरात अनेकांना जेवणानंतर आराम करायला आवडते, पण ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर (Office Lunch) आळशीपणा दूर करणे सहसा अनेकांसाठी आव्हानात्मक असते. अशा वेळी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो (Tips) करून  दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या झोपेला दूर सारू शकता. तसे, बर्‍याच तज्ञांच्या मते, दुपारी थोडी झोप घेणे आरोग्यासाठी एनर्जी बूस्टरचे काम करते. पण ऑफिसमध्ये झोपणे शक्य नाही. अशा स्थितीत अनेकांना जेवणानंतर झोप येऊ लागते आणि त्यामुळे ते कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जाणून घेऊया यावर मात करणाऱ्या काही टिप्स.

आवडते गाणे ऐका

गाणे ऐकणे ही एक प्रकारची उत्तम थेरपी आहे. अशा वेळी दुपारच्या जेवणानंतर आळस दूर करण्यासाठी तुम्ही तुमचे आवडते गाणे ऐकू शकता. शांत संगीत ऐकणे टाळा अन्यथा आणखी झोप येईल. म्हणूनच ऑफिसमध्ये जेवणानंतर पार्टी गाणे ऐकणे केव्हाही चांगले.  गाणे ऐकण्यासाठी हेड फोनचा वापरा आवश्य करा.

कॉफी प्या

चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीरातील आळस दूर करून एनर्जी लेव्हल वाढवण्यास मदत करते. मात्र, जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर थोड्या प्रमाणात कॉफी घेऊन तुम्ही सुस्तीला निरोप देऊ शकता.

हायड्रेटेड रहा

ऑफिसमध्ये दुपारचे जेवण घेतल्यानंतर तुम्हाला आळशी वाटत असेल तर जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा. अन्यथा, यामुळे तुम्ही अधिक सुस्त होण्याची शक्यता आहे. अशा वेळी थोडं ॲक्टिव्ह राहा आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पीत राहा.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.