AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारीक व्हायचं असेल तर या तीन गोष्टी नक्की करा, आजपासूनच करा सुरुवात

लठ्ठपणाच्या समस्येमुळे अनेकांना आपले आवडते कपडे घालता येत नाहीत. तसेच शरीरात काही दुखणी देखील सुरु होतात.त्यामुळे काही नियम आपल्या शरीराला लावून घेतले तर आपले वजन कमी करण्यास मदत होते.

बारीक व्हायचं असेल तर या तीन गोष्टी नक्की करा, आजपासूनच करा सुरुवात
weight loss tips
| Updated on: Nov 04, 2024 | 10:24 PM
Share

लठ्ठपणाची समस्या सध्या वाढत चालली आहे. बैठी काम करण्याची शैली तसेच बिघडलेले दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक यामुळे भारतीय लोक लठ्ठपणाचे बळी होत चालले आहेत. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होते. वाढत्या वजनाने अनेक दुखणी मागे लागतात. त्यामुळे काही सोपे उपाय जर अमलात आणले तर आपल्या शरीराची चरबी वितळण्यास मदत मिळू शकते. लठ्ठपणा आणि आपल्या आहार विहाराचा जवळचा संबंध आहे. जर आपण याविषयीचे नियम पाळले तर नक्की लठ्ठपणापासून वाचू शकतो.

सकस आणि भरपूर नाश्ता करावा –

जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर ब्रेकफास्ट मध्ये पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अन्नपदार्थांचा वापर केला पाहीजे. ब्रेकफास्ट करण्याचे कधी टाळू नये. यात आपण प्रोटीन, फायबर,ज्यूस, फळे, ओट्स आदीचा वापर करु शकता. प्रोटीनने भरपूर असलेला आहार घ्यावा. जंक फूड, मैदा, साखर, आणि तळलेले पदार्थ खाण्यापासून दूर रहावे. फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. यात फायबर आणि पोषक तत्वाचं प्रमाण जास्त असते. कोबीच्या भाजीचा आहारात समावेश करावा, यातील टॅरटेरिक एसिड,शरीरातील कार्बोहायड्रेटचे चरबीत रुपांतर करीत नाही. जेवण करताना प्रत्येक घास नीट चावून चावून खावा.

सकाळी लवकर उठवण्याची सवय करा –

जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, आयुर्वेदानुसार रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवे. त्यामुळे अनेक आजारातून सुटका मिळते. सकाळी लवकर उठल्याने आपले शरीर सक्रीय राहाते आणि शरीर नीट कार्य करु लागते. त्यामुळे सक्रीय झालेल्या शरीरात चरबी देखील वेगाने वितळत असते.

रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे –

सकाळी उठल्यानंतर आपण कोमट पाणी उपाशीपोटी प्यायला हवे, त्यामुळे मेटबॉलिज्म वेगाने होते. आपले शरीराचे डिटॉक्सिफाय लवकर वेगाने होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही कोमट पाण्यात लिंबू रस टाकून प्यायल्यास ही फायदा होतो. जर यात मध, आल्याचा रस आणि एप्पल सायडर विनेगर मिळून देखील पिता येऊ शकते.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.