AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात त्वचा निरोगी कशी ठेवावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव होते आणि खाज सुटायला लागते. अनेकदा ही समस्या इतकी वाढते की डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, थंडीत त्वचेची समस्या का उद्भवते? याबाबत माहिती जाणून घ्या.

हिवाळ्यात त्वचा निरोगी कशी ठेवावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 11:33 PM
Share

आपली त्वचा चमकायला कोणाला नको असते? यासाठी लोक, विशेषत: स्त्रिया विविध गोष्टींचा अवलंब करतात, पण थंडीच्या ऋतूपर्यंत त्वचा निस्तेज होऊ लागते. हिवाळ्यात बहुतेक लोकांमध्ये त्वचेच्या समस्या वाढतात. त्वचेत ताणणे आणि कोरडेपणा ही समस्या सामान्य बनते.

या ऋतूत ओठ, गुडघे आणि बोटांची त्वचाही क्रॅक होऊ लागते. तसेच एक्झामा किंवा सोरायसिसची समस्या अधिक गंभीर बनते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही समस्या फक्त थंड हवामानातच का वाढू लागते. ही समस्या या ऋतूत उद्भवते की उन्हाळ्यातही वाढते? चला तर मग आम्ही तुम्हाला याविषयी सांगण्याचा प्रयत्न करूया.

डॉक्टरांशी बोलल्यानंतर आम्ही तुम्हाला या समस्येबद्दल सविस्तर सांगणार आहोत. जेणेकरून या ऋतूत ही समस्या का उद्भवते हे तुम्हाला समजेल.

दिल्लीच्या पीएसआरआय रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. भाविक धीर यांनी सांगितले की, हिवाळ्यात त्वचेची समस्या ही एक सामान्य समस्या आहे. थंड हवामान आणि कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी पडते. अशावेळी त्वचेची समस्या अधिक चव्हाट्यावर येते. या ऋतूत बहुतेकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते. यामुळे त्वचेचेही नुकसान होते. गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले.

जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका

डॉ. भाविक सांगतात की, गरम पाण्यामुळे आपल्या त्वचेचा ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी आणि खाज सुटते. अशा वेळी कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले मानले जाते. आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझरचा वापर करावा.

थंडीत काही घरगुती वस्तूंचा अवलंब करून तुम्ही त्वचेची चांगली काळजी घेऊ शकता, असे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे तुमची त्वचा चांदीसारखी चमकेल.

त्वचेची काळजी कशी घ्यावी?

कोमट पाण्याने आंघोळ करा आंघोळीनंतर लगेचच संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझर लावा सौम्य पीएच असलेला साबण वापरा केसांना तेल लावू नका, तेल लावल्यास शॅम्पूने धुवा. प्रदूषण टाळा. यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही. खानपानाकडे विशेष लक्ष द्या

पुरेशी झोप आणि आहार घ्यायला विसरू नका

थंडीच्या दिवसात पुरेशी झोप घ्यावी. यामुळे तुमचे शरीरही फिट आणि फाइन राहते. याशिवाय खानपानाकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या आहारात व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन C आणि ओमेगा- 3 फॅटी अ‍ॅसिड युक्त पदार्थांचा समावेश करा. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. तसेच थंडीत पुरेसे पाणी प्यावे. कारण शरीर हायड्रेटेड ठेवल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. त्यामुळे दिवसभरात 3 ते 5 लिटर कोमट पाण्याचे सेवन करत रहा.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....