AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजलीचे खास आयुर्वेदिक औषध, सर्दी-खोकला, डोकेदुखीला करा बाय-बाय

पतंजली संशोधन संस्थेचे आचार्य बालकृष्ण यांच्या मते, डोकेदुखी, पोटदुखी, पोटात गॅस यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पतंजली दिव्य धारा औषध खूप उपयुक्त ठरू शकते. या औषधाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पतंजलीचे खास आयुर्वेदिक औषध, सर्दी-खोकला, डोकेदुखीला करा बाय-बाय
Patanjali Divya Dhara
| Updated on: Jun 20, 2025 | 7:03 PM
Share

पावसाळ्यात सर्दी, खोकला पोटदुखी अशी समस्या वाढतात. तसेच अनेकांना गॅस आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या दिनचर्येवर परिणाम होते. मात्र पतंजली संशोधन संस्थेचे आचार्य बालकृष्ण यांच्या मते, डोकेदुखी, पोटदुखी, पोटात गॅस यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पतंजली दिव्य धारा औषध खूप उपयुक्त ठरू शकते. या औषधाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पतंजली कंपनीने तयार केलेले पतंजली दिव्यधारा हे एक खास आयुर्वेदिक औषध आहे. जे द्रव स्वरूपात येते आणि डोकेदुखी, पोटदुखी, सर्दी आणि खोकला यासारख्या आजारांवर उपचारासाठी वापरले जाते. या औषधात पेपरमिंट, कापूर, भीमसेनी अर्क, ओव्याचा अर्क आहे. पतंजली दिव्यधारा कोणत्या आजारांमध्ये कसे वापरायचे ते जाणून घेऊयात.

डोकेदुखी

सध्याच्या युगात डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पतंजली दिव्यधारा वापरून डोकेदुखी बरी होऊ शकते. यात असलेले पेपरमिंट आणि कापूर डोकेदुखीपासून लवकर आराम मिळण्यास मदत करतात. या औषधाचे 3-4 थेंब घेऊन हलक्या हातांनी कपाळावर मालिश केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

दातदुखी

व्यवस्थित ब्रश न केल्याने किंवा कडक पदार्थ खाल्ल्याने दातदुखीचा त्रास होतो. मात्र दातदुखी कधीकधी असह्य होते. अशावेळी पतंजली दिव्यधारा वापरून दातदुखीपासून आराम मिळू शकतो.

सर्दी

तुम्हाला सर्दी किंवा कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पतंजली दिव्यधारा वापरून तुमची समस्या दूर होऊ शकते. अर्धा ते एक लिटर गरम पाण्यात पतंजली दिव्य धाराचे 4-5 थेंब टाका आणि वाफ घ्या, यामुळे आराम मिळेल.

शरीरावर जखम झाल्यास

शरीरावर कुठेही किरकोळ जखम झाल्यास पतंजली दिव्यधारा वापरता येते. याच्या वापरामुळे दुखापतीमुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी होतात आणि जखम देखील लवकर बरी होते.

दमा

हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागतो. आचार्य बालकृष्ण यांच्या मते दम्याच्या रुग्णांनी पतंजली दिव्यधाराच्या 3-4 थेंबांचा वास घ्यावा, यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. तसेच रुग्णाच्या छातीवर पतंजली दिव्यधाराने मालिश केल्यासही फायदा होतो.

डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा

पतंजली दिव्य धारा अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरते, मात्र ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.