AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

आरोग्याच्या दृष्टीने फळं खाणं फायदेशीर मानलं जातं. मात्र काही गोष्टी योग्य वेळी न केल्यास शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशाच एक बाब म्हणजे केळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं. आयुर्वेदानुसार याबाबत काही स्पष्ट नियम आहेत. चला जाणून घेऊया योग्य पद्धत काय आहे.

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
| Edited By: | Updated on: Jul 18, 2025 | 10:32 PM
Share

केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श मानलं जातं. परंतु, केळा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नावर आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. चला जाणून घेऊया, नेमकं कोणता नियम पाळावा आणि काय करावं टाळावं.

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार, केळं हे थंड प्रकृतीचं फळ मानलं जातं. यामुळे शरीराला थोडी शितलता मिळते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन C यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. पण त्याचबरोबर, त्याचे थंड गुणधर्म पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार, केळा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणं टाळावं, कारण यामुळे पचन क्रिया मंद होऊ शकते आणि खालील त्रास उद्भवू शकतात:

1. पोटात गॅस होणं

2. अपचन होणं

3. घशात खवखव

4. सर्दी किंवा खोकला वाढणं

विशेषतः थंडीच्या दिवसात किंवा जेव्हा एखाद्याला आधीपासूनच पचनाचा त्रास असेल, अशा वेळी हा प्रकार अधिक नुकसानदायक ठरू शकतो.

पाणी प्यायचंच असेल तर काय करावं?

जर तुम्हाला खूप तहान लागली असेल आणि पाणी पिणं टळणं शक्य नसेल, तर गुनगुणं पाणी पिणं चांगला पर्याय ठरतो. हे पाणी पचनक्रियेला मदत करतं आणि कुठल्याही प्रकारचा गॅस, ऍसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. पाणी पिण्याचा योग्य वेळ म्हणजे केळा खाल्ल्यानंतर 20–30 मिनिटांनी.

आधुनिक विज्ञानाचं मत काय आहे?

सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, केळ्यानंतर पाणी पिणं तसं हानिकारक नसतं, परंतु ज्यांचं पचन नाजूक आहे किंवा ज्यांना आधीपासूनच गॅस्ट्रिक समस्यांचा त्रास आहे, त्यांनी थोडा संयम ठेवलेला चांगला. काही डॉक्टर यावर हेही सांगतात की, पाचक तंत्र व्यवस्थित काम करावं यासाठी एखादा वेळ द्यावा, म्हणजे केळ्याचे पोषण घटक व्यवस्थितपणे शरीरात शोषले जातील.

केळा खाण्याचे फायदे

1. पचनतंत्र सुधारतं

2. हाडं मजबूत होतात

3. हृदयासाठी फायदेशीर

4. रक्तदाब नियंत्रणात राहतो

5. स्नायूंच्या वेदना कमी होतात

6. लगेच ऊर्जा मिळते

वर्कआउटच्या आधी किंवा सकाळच्या नाश्त्यात केळा खाल्ल्यास शरीराला आवश्यक एनर्जी मिळते, म्हणूनच अनेक आहारतज्ज्ञ याची शिफारस करतात.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.