AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलंच! म्हणे निष्काळजीपणामुळे कमी होतो स्ट्रेस

असं म्हणतात की माणसाने चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात. पण एका अभ्यासानुसार वाईट सवयी या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

ऐकावं ते नवलंच! म्हणे निष्काळजीपणामुळे कमी होतो स्ट्रेस
Image Credit source: Freepik
| Updated on: Dec 15, 2022 | 10:30 AM
Share

नवी दिल्ली – लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की चांगल्या सवयी (good habits) अंगी बाणवाव्यात. एखादी चुकीची गोष्ट केली तर आपल्याला ओरडा ऐकावा लागायचा. मुलांनी दातांनी नखं खाणं, केसांत बोटं फिरवत राहणं आणि सामान जागेवर न ठेवता पसारा करून ठेवणं अशा अनेक सवयी असतात. अशावेळी मोठी माणसं लहान मुलांना या वाईट सवयी (bad habits) सोडून देण्यास व चांगल्या सवयी अंगिकारण्यास सांगायचे. मात्र आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. या वाईट सवयी आपल्या आरोग्यासाठी (effect on health) फायदेशीर मानल्या जातात.

नखं कापल्याने वाढते इम्युनिटी

आपल्यापैकी अनेक लोकांना दातांनी नखं कापायची सवय असते. वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, अशा रितीने नखं कापणे हे आरोग्यासाठी चांगले ठरते. यामुळे शरीरात नव्या बॅक्टेरियांची निर्मिती होते, ज्यामुळे भविष्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

च्युइंगम खाणे

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जण च्युइंगम खाताना दिसतात. कदाचित या सवयीमुळे तुम्हाला इरिटेट होत असेल पण एका रिपोर्टनुसार, च्युइंगम खाल्ल्याने आपला फोकस वाढतो आणि बऱ्याच कालावधीपर्यंत लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तसेच स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासही मदत होते.

गप्पा मारणे

गॉसिप करणारे लोक इतरांना फारसे आवडत नाहीत. पण गॉसिपिंग केल्याने स्ट्रेस म्हणजेच ताण-तणाव दूर होतो, हे तुम्हाला माहीत आहे

का ? भरपूर गप्पा मारल्याने तुमचा तणाव आपोआप कमी होतो.

बिनधास्त हसा

जे लोक नेहमी हसत असतात, त्यांच्याकडे इतर लोक कधीकधी वेगळ्याच दृष्टीने पाहतात. सतत खी-खी करणाऱ्या लोकांची एक वेगळी इमेज बनते. तुम्हालाही असं वाटत असेल तर हे नक्की वाचा. हसल्याने आणि इतर व्यक्तींशी गप्पा मारल्याने आनंद मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला खुश रहायचं असेल तर बिनधास्तपणे हसा .

निष्काळजीपणामुळे ताण होतो कमी

काही लोकांना कुठेही उशीरा पोहोचण्याची सवय असते. शाळा, कॉलेज, ऑफिस असो वा घर, किंवा एखाद्या समांरभात जायचे असेल तरी हे लोक कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. मात्र एका अभ्यासानुसार, जे लोक वेळेबाबत (वेळ पाळण्याबाबत) बेफिकीर असतात, त्यांना कमी स्ट्रेस असतो. ते इतरांपेक्षा निरोगी जीवनशैली जगतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?