AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर

टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते.

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर
टीबीची लक्षणे, उपचार पध्दत आणि नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, जाणून घ्या. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 10:34 AM
Share

मुंबई : टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते. टीबीची सुरूवातीची लक्षणे (Symptoms) लोकांना समजण्यास उशीर होतो. बर्‍याच वेळा लोक टीबीच्या लक्षणांना सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात, अशावेळी हा आजार गंभीर स्थितीत पोहोचतो आणि काही वेळा तो प्राणघातक ठरतो.

टीबी होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणे, धुम्रपान किंवा जास्त प्रमाणात मद्यपान, संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे, लहान मुले, वृद्ध, गरोदर स्त्रिया, किडनीचे आजार, मधुमेह किंवा इतर जुनाट आजारांनी ग्रस्त लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होते. ज्यामुळे त्यांना या आजाराचा धोका वाढतो. याशिवाय ज्या लोकांचे अवयव प्रत्यारोपण, कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपी झाली आहे, असे लोकही टीबीच्या बाबतीत हाय रिस्क झोनमध्ये येतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, धाप लागणे, भूक न लागणे किंवा कमी होणे, थकवा किंवा अशक्तपणा, वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे, कधीकधी श्लेष्मामध्ये रक्त येणे. आजच्या काळात हा आजार वाढतच जात आहे. त्यासाठी लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. एकदा क्षयरोगाची पुष्टी झाल्यानंतर, विशेषज्ञ सहा ते नऊ महिन्यांचा कोर्स करून त्यावर उपचार करतात. जर क्षयरोगाने गंभीर स्वरूप धारण केले असेल, तर हा उपचार 18 ते 24 महिन्यांपर्यंत चालू शकतो. परंतु उपचारात अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

उपचार नेमका कसा केला जातो! 

टीबीवर उपचार सुरू असताना औषधांमध्ये अंतर येऊ देऊ नका. अन्यथा उपचार पुन्हा सुरू करावे लागतील. त्यामुळे या बाबतीत तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करा. टीबीची लागण झालेल्या लोकांपासून योग्य अंतर ठेवा. स्वच्छतेची काळजी घ्या. कोणाशीही बोलत असताना नाक-तोंडावर कपडा ठेवा. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा. नियमित व्यायाम करा. विशेष म्हणजे टीबी असलेल्या रूग्णांने नेहमीच इतरांना बोलताना किंवा घरामध्ये, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रूमाल बांधावा.

(टीप : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही आजारतात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आजारवर उपचार सुरू करा.)

संबंधित बातम्या : 

लहान मुले सतत आजारी पडतायेत? मग मुलांपासून आजार दूर ठेवण्यासाठी डाॅक्टरांच्या या खास टिप्स फाॅलो आणि मुलांना निरोगी ठेवा!

World TB Day : 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....