AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किडनीच्या आजाराची 7 लक्षणे कोणती? या उपायाने मिळेल दिलासा, वाचा एका क्लिकवर

Kidney Failure Symptoms: किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंडाच्या माध्यमातून रक्त फिल्टर करण्याचे आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम होते. त्यामुळे मूत्रपिंडाचे योग्य कार्य आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला किडनी म्हणजेच मूत्रपिंडाची 7 लक्षणे कोणती आहेत, हे सांगणार आहोत. तसेच यावरील उपायही जाणून घ्या.

किडनीच्या आजाराची 7 लक्षणे कोणती? या उपायाने मिळेल दिलासा, वाचा एका क्लिकवर
| Edited By: | Updated on: Nov 06, 2024 | 10:46 AM
Share

किडनी म्हणजे मूत्रपिंड आजाराचे योग्य वेळी निदान झाल्यात तुम्ही योग्य उपचार घेऊ शकतात. तसेच या आजारावर वेळीच उपाय करू शकतात. आज आम्ही तुम्हाला किडनी म्हणजेच मूत्रपिंडाची 7 लक्षणे कोणती आहेत, हे सांगणार आहोत. तसेच किडनी आजारावरील उपायही सांगणार आहोत. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

खराब आहार आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम देखील आपल्या शरीरावर होतो. अनेक लक्षणे तुमच्या शरीरात मूत्रपिंड म्हणजेच किडनी खराब होण्यासंदर्भात दिसू शकतात. पण, याची तुम्हाला माहिती हवी. ही लक्षणे लवकर ओळखून वेळीच योग्य उपचार आणि खबरदारी घेतल्याने आपण मूत्रपिंड पुन्हा निरोगी बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला मूत्रपिंडाच्या अशाच लक्षणांबद्दल सांगणार आहोत. हे लक्षणे तुम्हाला मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत आहे की नाही, हे सूचित करते. दरम्यान, ही लक्षणे कोणती आहेत, याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे कोणती?

लघवीतील बदल : लघवीचा रंग, प्रमाण किंवा वास बदलणे हे मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. जसे की लघवीमध्ये फोम येणे, रक्तस्त्राव होणे किंवा खूप कमी किंवा जास्त लघवी.

सूज : पाय, गुडघे किंवा चेहऱ्याला सूज येणे हे मूत्रपिंडात पाणी साचण्याचे लक्षण असू शकते. थकवा आणि अशक्तपणा: जेव्हा मूत्रपिंड योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असू शकते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.

उच्च रक्तदाब : रक्तदाब नियंत्रित करण्यात मूत्रपिंड महत्त्वाची भूमिका बजावते. जर मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसेल तर रक्तदाब वाढू शकतो.

मळमळ आणि उलट्या : मूत्रपिंडाच्या आजारामुळे मळमळ आणि उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

चक्कर येणे : मूत्रपिंडाच्या आजारामुळे रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे भूक कमी होते. यामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.

त्वचेत खाज सुटणे : मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्वचेला खाज येऊ शकते.

लघवीतील प्रथिने : लघवीमध्ये प्रथिने असणे हे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य न करण्याचे लक्षण असू शकते.

आम्ही तुम्हाला मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे सांगितली. आता मूत्रपिंडाचा आजार टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण घेऊ शकता अशी काही खबरदारी, याविषयीची माहिती खाली विस्ताराने सांगत आहोत.

मूत्रपिंड निरोगी ठेवण्याचे उपाय कोणते?

रक्तदाब नियंत्रित करा : उच्च रक्तदाब मूत्रपिंडाचे नुकसान करू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मधुमेहावर नियंत्रण ठेवा : मधुमेह हे मूत्रपिंडाच्या आजाराचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

वजन नियंत्रित ठेवा : लठ्ठपणामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे निरोगी वजन राखणे गरजेचे आहे.

नियमित व्यायाम : नियमित व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास, वजन कमी होण्यास आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्या : भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांना विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. मीठाचे सेवन कमी करा: जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे.

धुम्रपान करू नका : धूम्रपान केल्याने मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या औषधे: काही औषधे मूत्रपिंडाचे नुकसान करू शकतात. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

(टीप- लेखातील नमूद उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Follow Us
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.