AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड पदार्थांचे सेवन कधी करावेत? जेवणाआधी की जेवणानंतर, जाणून घ्या आयुर्वेद तज्ञांकडून

आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर गोड काहीतरी खायला लागत. अशातच आज आपण गोड पदार्थां कधी खावे याबद्दल आयुर्वेद तज्ञांकडून जाणून घेऊयात.

गोड पदार्थांचे सेवन कधी करावेत? जेवणाआधी की जेवणानंतर, जाणून घ्या आयुर्वेद तज्ञांकडून
food
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 1:42 PM
Share

आजकाल बदलत्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेताना अनेकजण नो शुगर आणि कमी सोडियम असलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. जरी आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी केले जाते पण सत्य हे आहे की गोड पदार्थ आणि मीठ दोन्ही शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यांचे सेवन फक्त संतुलित प्रमाणात केले पाहिजे. आजकाल फिटनेस आणि आरोग्याबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी गोड पदार्थांपासून दूर राहायला सुरुवात केली आहे, नो शुगर किंवा कमी साखर असलेले पदार्थ खाण्यावर भर देत आहेत आणि हा ट्रेंडही झपाट्याने वाढला आहे, पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ पूर्णपणे सोडणे योग्य नाही. शरीराच्या संतुलनासाठी आणि ऊर्जेसाठी मर्यादित प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन आवश्यक मानले जाते, पण तुम्हाला माहित आहे का की आयुर्वेदानुसार गोड पदार्थ शरीरासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे सेवन केव्हा व किती प्रमाणात केले पाहिजे? ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती आहे?

जेवणानंतर लोकांना अनेकदा गोड खाण्याची इच्छा होते, पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाआधी खाल्ले पाहिजेत. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर तुम्ही घरी बनवलेला शिरा, हलवा किंवा गूळ व खजुरापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे देखील खाऊ शकता.

गोड पदार्थ खाताना मात्र या पदार्थांचे सेवन टाळा

हे गोड पदार्थ टाळा: गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईस्क्रीम किंवा पॅकेज गोड पदार्थ खाणे टाळा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, जे मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच जेवणानंतर गोड खाणे टाळा, कारण त्यामुळे कफ दोष वाढतो.

गोड पदार्थ खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सेवन मर्यादित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. साखरेच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, सूज, मधुमेह, सुस्ती आणि खोकल्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा