AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड पदार्थांचे सेवन कधी करावेत? जेवणाआधी की जेवणानंतर, जाणून घ्या आयुर्वेद तज्ञांकडून

आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर गोड काहीतरी खायला लागत. अशातच आज आपण गोड पदार्थां कधी खावे याबद्दल आयुर्वेद तज्ञांकडून जाणून घेऊयात.

गोड पदार्थांचे सेवन कधी करावेत? जेवणाआधी की जेवणानंतर, जाणून घ्या आयुर्वेद तज्ञांकडून
food
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 1:42 PM
Share

आजकाल बदलत्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेताना अनेकजण नो शुगर आणि कमी सोडियम असलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. जरी आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी केले जाते पण सत्य हे आहे की गोड पदार्थ आणि मीठ दोन्ही शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यांचे सेवन फक्त संतुलित प्रमाणात केले पाहिजे. आजकाल फिटनेस आणि आरोग्याबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी गोड पदार्थांपासून दूर राहायला सुरुवात केली आहे, नो शुगर किंवा कमी साखर असलेले पदार्थ खाण्यावर भर देत आहेत आणि हा ट्रेंडही झपाट्याने वाढला आहे, पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ पूर्णपणे सोडणे योग्य नाही. शरीराच्या संतुलनासाठी आणि ऊर्जेसाठी मर्यादित प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन आवश्यक मानले जाते, पण तुम्हाला माहित आहे का की आयुर्वेदानुसार गोड पदार्थ शरीरासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे सेवन केव्हा व किती प्रमाणात केले पाहिजे? ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती आहे?

जेवणानंतर लोकांना अनेकदा गोड खाण्याची इच्छा होते, पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाआधी खाल्ले पाहिजेत. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर तुम्ही घरी बनवलेला शिरा, हलवा किंवा गूळ व खजुरापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे देखील खाऊ शकता.

गोड पदार्थ खाताना मात्र या पदार्थांचे सेवन टाळा

हे गोड पदार्थ टाळा: गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईस्क्रीम किंवा पॅकेज गोड पदार्थ खाणे टाळा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, जे मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच जेवणानंतर गोड खाणे टाळा, कारण त्यामुळे कफ दोष वाढतो.

गोड पदार्थ खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सेवन मर्यादित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. साखरेच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, सूज, मधुमेह, सुस्ती आणि खोकल्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.