AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mask in House : आता घरातही मास्क घालणं आवश्यक, कारण काय? वाचा सविस्तर…

कोविड-19 विषाणूच्या नियंत्रणासाठी बनवण्यात आलेल्या नॅशनल टास्‍क फोर्सचे (NTF) प्रमुख डॉक्‍टर व्ही. के. पॉल यांनी आता घरातही मास्क घालण्याची वेळ आल्याचं म्हटलंय.

Mask in House : आता घरातही मास्क घालणं आवश्यक, कारण काय? वाचा सविस्तर...
mask-covid
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 27, 2021 | 7:56 PM
Share

नवी दिल्ली : कोविड-19 विषाणूच्या नियंत्रणासाठी बनवण्यात आलेल्या नॅशनल टास्‍क फोर्सचे (NTF) प्रमुख डॉक्‍टर व्ही. के. पॉल यांनी आता घरातही मास्क घालण्याची वेळ आल्याचं म्हटलंय. यावरुन कोरोना संसर्गाचं गांभीर्य आणि त्याचा धोका लक्षात येऊ शकतो. टास्क फोर्सच्या या सूचनेनंतर घरात मास्क घालण्याची वेळ येण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याच प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा खास आढावा (Why Mask are important in House to prevent Corona also know all about it).

भारतात सोमवारी (26 एप्रिल) रोजी 3 लाख 52 हजार 991 नवे कोरोना रुग्णा सापडले. याशिवाय 2 हजार 812 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. सध्या देशात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 28 लाख 13 हजार 658 वर पोहचली आहे. त्यातच नॅशनल टास्क फोर्सने घरातही मास्क घालण्याची सूचना करणं परिस्थितीचं गांभीर्य वाढवणारं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक असल्याचं टास्क फोर्सने म्हटलंय.

घरात मास्क घालणं का महत्त्वाचं?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग घराघरात पोहचला आहे. यातील काहींना लक्षणं दिसतात तर काहींना नाही. ज्यांना लक्षणं दिसतात त्यांना ओळखून विलगीकरणा तरी ठेवता येतं मात्र ज्यांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत ते कोरोना विषाणूचे स्प्रेडर ठरतात. म्हणूनच विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. नव्या कोरोना विषाणूंची संसर्ग क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे घरातील एकाला जरी कोरोना संसर्ग झाला तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण घर कोरोना बाधित होण्याचं प्रमाण वाढलंय.

लक्षणं नसलेल्या कोरोना बाधितांकडून सर्वात मोठा धोका

कोरोना बाधित व्यक्ती शिंकल्यानंतर नाका तोंडातून निघणारे सुक्ष्म ड्रॉपलेट घरात पसरतात. यामधूनच हा विषाणू घरातील एका सदस्याकडून इतर सर्व सदस्यांपर्यंत पोहचतो आणि मोठ्या प्रमाणात संसर्ग करतो. हे कण हवेतून इतरत्रही पसरत आहेत. हे रोखण्यासाठीच घरातही मास्क घालण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

कुटुंबाला वाचवायचं असेल तर घरातही मास्क गरजेचा

डॉक्‍टर पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मोठ्या लोकसंख्येत कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हेच लोक कोरोना संसर्गात सर्वात धोकादायक ठरत आहेत. हे लक्षण नसलेले लोक बोलताना त्यांच्या तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्सही संसर्गाचं कारण ठरत आहेत. त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय.

हेही वाचा :

कर्नाटकमध्ये नवा प्रयोग, मास्क फेकल्यानंतर थेट झाड उगवणार; जाणून घ्या नेमकं कसं ?

मास्कवरुन वाद, तरुणाने खुलेआम पोलीस अधिकाऱ्याच्या थोबाडीत लगावली, व्हिडीओ व्हायरल

Video: मास्क का घातला नाही म्हणून जोडप्याला पोलिसांनी ‘हटकलं’, तर बया थेट ‘किसवर’ आली, बघा काय घडलं?

व्हिडीओ पाहा :

Why Mask are important in House to prevent Corona also know all about it

Follow Us
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’