AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यानं बलाढ्य देश चालवला, त्याचा ऑपरेशन सिंदूरला सपोर्ट, जगात भारी नेता काय म्हणाला? पाकिस्तान मात्र…

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पिओके आणि पाकिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

ज्यानं बलाढ्य देश चालवला, त्याचा ऑपरेशन सिंदूरला सपोर्ट, जगात भारी नेता काय म्हणाला? पाकिस्तान मात्र...
narendra modi and shehbaz sharif
| Updated on: May 07, 2025 | 10:53 PM
Share

Operation Sindoor : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पिओके आणि पाकिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांच्या खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, भारताच्या या कारवाईचे जगभरातील अनेक देश समर्थ करत आहेत.

दहशतवाद्यांना शिक्षेतून सूट मिळायला नको…

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेसह अनेक देशांना या कारवाईची माहिती दिली. दरम्यान, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताच्या या ऑपरेशनचा पाठिंबा दिला आहे. अन्य देशांच्या अख्त्यारीत असलेल्या जमिनीतून दहशतवादी हल्ले होत असतील तर ते कोणताही देश सहन करणार नाही. भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले हे समर्थनीय आहे. दहशतवाद्यांना शिक्षेतून सूट मिळायला नको, असे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.

ऋषी सुनक जागतिक पटलावरचे मोठे नेते

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत. ब्रिटन हा देश जागतिक पटलावर मोठा आणि महत्त्वाचा असा देश आहे. या देशाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम इतरही देशांवर पडतात. याच ब्रिटनचे नेतृत्त्व ऋषी सुनक यांनी केलेले आहे. ते ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यांनी ब्रिटनसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळेच ऋषी सुनक यांचे जागतिक नेते म्हणून मोठे वजन आहे. याच ऋषी सुनक यांनी ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले आहे. त्यांनी भारताने केलेली कृती योग्य असल्याचे म्हटले आहे.

100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार

दरम्यान, भारताने 6-7 मेच्या रात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एकूण 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने केलेल्या कारवाईत एकूण 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. भारताने मात्र या कृतीला युद्ध छेडण्याची कृती असल्याचे म्हटले आहे. भारताने हे हल्ले केल्यानंतर आमची ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरोधात होती, असं स्पष्ट केलंय. आम्ही पाकिस्ताच्या नागरिकांवर तसेच सैनिकांवर हल्ला केलेला नाही, असे भारताने स्पष्ट केलंय.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.