AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची तक्रार, मोठा धक्का, इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी उत्पादन..

मागील काही दिवसांपासून भारत-चीन एकत्र आल्याचे बघायला मिळाले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत चीन पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचे बघायला मिळाले. मात्र, आता चीनने भारतावर गंभीर आरोप केला आहे.

आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची तक्रार, मोठा धक्का, इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी उत्पादन..
India Electric Vehicle (EV) and Batteries
| Updated on: Oct 17, 2025 | 4:13 PM
Share

अमेरिकेने भारतासह चीनवर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीन भारताच्या बाजूने मैदानात उतरला.  हेच नाही तर भारत आणि चीनमध्ये यादरम्यान महत्वाचे करार झाले आणि भारतासाठी दुर्मिळ खनिज्यांवरील निर्बंध देखील उठवले. सध्या चीन आणि अमेरिकेत तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेने चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये रशियाकडून चीनने तेल खरेदी बंद केली नाही तर 500 टक्के अमेरिका चीनवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. 100 टक्के टॅरिफ दुर्मिळ पृथ्वी  खनिज्यांवरील निर्बंधांमुळे लावण्यात आला. आता चीन आणि अमेरिकेतील तणावात चीनने भारतावर गंभीर आरोप केला.

भारत इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी उत्पादन वेगाने विकसित करत आहे. दिवसेंदिवस उत्पादन चांगलेच वाढत आहे. सरकारने या क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना सुरू केली. ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठ्या EV बाजारपेठांपैकी एक बनला आहे. तिथेच चीनची पोटदुखी उठली. भारताच्या वाढत्या यशावर चीनचा जळफळाट उठला असून चीन यावरून नाराज आहे.

हेच नाही तर चीनने थेट भारताविरोधात जागतिक व्यापार संघटनेत (WTO) तक्रार दाखल केली आहे. चीनचे म्हणणे आहे की, भारताच्या अनुदान योजना जागतिक व्यापार नियमांचे उल्लंघन करत आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. चीनला भारताने त्यांच्यासारखे धोरण थांबवावे वाटतंय. वेगाने विस्तारणाऱ्या भारतीय औद्योगिक धोरणाला धोका असल्याचेही चीनने म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांना देशांतर्गत अधिक इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार करता याव्यात यासाठी अनुदान दिले जाते. मात्र, यामुळे चीनच्या कंपन्यांना फटका बसत आहे. भारत स्वत: चे इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार करत असल्याने चीनने धसका घेतला. भारताच्या सबसिडी नियमांच्या विरुद्ध आहेत, कारण त्यांच्यााकडून परदेशी कंपन्यांना समान संधी दिली जात नाही आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आयात कमी करण्याचा प्रयत्न करतात, असा थेट आरोप चीनने केला आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक