AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन पुन्हा तोंडावर आपटला, गलवान घाटीत 38 चीनी सैनिक वाहून गेल्याचा ऑस्ट्रेलियन रिपोर्ट

पण खरा आकडा चीननं लपवल्याचं आता सिद्ध होतंय. आधी अमेरीकन रिपोर्ट आणि आता ऑस्ट्रेलियन रिपोर्टनुसार 38 चीनी सैनिक मारले गेलेत. त्यामुळे चीन माहिती लपवून पुन्हा एकदा तोंडावर पडलाय.

चीन पुन्हा तोंडावर आपटला, गलवान घाटीत 38 चीनी सैनिक वाहून गेल्याचा ऑस्ट्रेलियन रिपोर्ट
गलवान घाटीत गेल्या दीड वर्षापासून अस्वस्थता आहे. प्रातिनिधीक फोटो (Image Source - ANI)
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 03, 2022 | 9:26 AM
Share

जवळपास दीड वर्षापूर्वी म्हणजेच जून 2022 मध्ये पूर्व लडाखच्या गलवान घाटीत (Galvan Valley) भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. पण याच घटनेत चीनचे (China in Galvan) नेमके किती सैनिक मारले गेले याचा खरा आकडा अजूनही समोर आला नाही. चीनकडून अधिकृतपणे चार सैनिक ठार झाल्याचं जाहीर केलं गेलं. पण प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचे काही अमेरीकन रिपोर्ट आले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिय रिपोर्ट समोर आलाय आणि ह्या रिपोर्टमध्ये चीनचे एक नाही दोन नाही तर जवळपास 38 सैनिक गलवान नदीत वाहून गेल्याचं सांगितलं गेलंय. ऑस्ट्रेलियाचा न्यूजपेपर द क्लॅक्सन (The Klaxon) ह्या इंग्रजी वर्तमानपत्रात हा रिपोर्ट छापला गेलाय. गलवान डिकोडेड नावानं हा रिपोर्ट प्रकाशित केला गेलाय आणि याला सोशल मीडिया रिसर्च टीमनं तयार केलंय. ऑस्ट्रेलियाच्या ह्या रिपोर्टमुळे पुन्हा एकदा चीनचा खोटारडेपणा जगासमोर उघडा पडलाय.

रिपोर्टमध्ये नेमकं काय? चीन कायम खरी माहिती लपवत आलेला आहे. आताही गलवान घाटीतल्या हिंसक घटनेनंतर आमचे फक्त 4 सैनिक मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं होतं. भारताच्या तुलनेत चीनची कशी काहीच हाणी झाली नाही असं चित्रं उभं करण्याचा प्रयत्न चीननं केला होता. अजूनही करतो. त्यासाठी चीननं सरकारी यंत्रणा कामाला लावली. ब्लॉग, पेजेस सोशल मीडियावरुन हटवले. पण ऑस्ट्रेलियाच्या क्लॅक्सन ह्या वर्तमानपत्राच्या सोशल मीडिया टीमनं चीनचा Weibo हा मुख्य डिजिटल प्लॅटफॉर्म धुंडाळला आणि त्यातून जी माहिती समोर येतेय, त्यानुसार त्या रात्री गलवान घाटीतल्या नदीत 38 चीनी सैनिक वाहून गेल्याची माहिती प्रकाशीत केलीय.

जून 2020 मध्ये नेमकं काय घडलं होतं? जवळपास 4 दशकानंतर चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात गलवान घाटीत हिंसक घटना घडली. गलवान घाटीत चीनी बाजूनं चीनी सैनिक काही काळापासून भौगोलिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न करतायत. रस्ते, पूल उभारतायत. त्याला उत्तर म्हणून भारतानेही काही अस्थायी पूल बांधायला घेतले. त्याच कारणावरुन दोन्ही देशांच्या सैन्य तुकड्या एकमेकांसमोर आल्या. त्यावरुन गलवान घाटीत दोन्हींमध्ये हिंसक झडप झाली. त्यात 15 जूनच्या रात्री 20 भारतीय सैनिक शहीद झाले. चीननं मात्र सुरुवातीला त्यांची कुठलीच जीवितहाणी झाली नसल्याचा दावा केला. नंतर दबाव वाढला तसा 4 जण मारले गेल्याचं कबूल केलं. नंतर त्यांना चीन सरकारनं मरणोत्तर सन्मानीतही केलं. पण खरा आकडा चीननं लपवल्याचं आता सिद्ध होतंय. आधी अमेरीकन रिपोर्ट आणि आता ऑस्ट्रेलियन रिपोर्टनुसार 38 चीनी सैनिक मारले गेलेत. त्यामुळे चीन माहिती लपवून पुन्हा एकदा तोंडावर पडलाय.

हे सुद्धा वाचा:

‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’

सीमेवर धुसफूस मात्र चीनशी व्यापारी सख्य कायम; निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ, आयात 28 टक्क्यांनी वाढली

डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली