AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ! भारतीय जहाजांवर फायरिंग होताच सरकारची मोठी कारवाई, इराणच्या… जगाचं लक्ष आता भारताकडे

India Iran Relation : होर्मुज सामुद्रधुनीतून जात असताना एका भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी नौदलाकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मोठी खळबळ! भारतीय जहाजांवर फायरिंग होताच सरकारची मोठी कारवाई, इराणच्या... जगाचं लक्ष आता भारताकडे
Iran indiaImage Credit source: Google
| Updated on: Apr 18, 2026 | 10:10 PM
Share

इराण आणि अमेरिकेत तणाव वाढलेला असताना होर्मुज सामुद्रधुनीतून जात असताना एका भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी नौदलाकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना समन्स पाठवले आहे. भारतीय टँकरवरील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सरकारने हा पाऊल उचलले आहे. हा हल्ला ओमानजवळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या या कडक भूमिकेनंतर इराणचे राजदूत मोहम्मद फहहाली तात्काळ परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

भारताकडून मोठी कारवाई

समोर आलेल्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीत इराकमधून तेल घेऊन जाणाऱ्या दोन जहाजांवर हल्ला झाला. यातील एक जहाज भारताचे होते, ज्यावर इराणी नौदलाने गोळीबार केला. यानंतर भारताने इराणी राजदूतांना समन्स बजावत घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली करत निषेध व्यक्त केला. या जहाजांवर सुमारे 20 लाख बॅरल इराकी तेल लोड केलेले होते. या घटनेनंतर परिसरातील तणाव अधिक वाढला आहे. आधीपासूनच अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव सुरू असताना आता होर्मुज परिसर अत्यंत संवेदनशील बनला आहे.

युद्धामुळे इराणमध्ये गोंधळाची परिस्थिती

भारताचा हा तेल टँकर होर्मुजजवळून जात असताना त्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र यात मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. सूत्रांच्या मते, सध्या इराणमध्ये युद्धामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या विविध लष्करी युनिट्समध्ये पूर्ण समन्वय नसल्याने अशा घटना घडत आहेत. यापूर्वी अमेरिकेकडूनही अशा प्रकारे चुकून स्वतःच्या किंवा सहयोगी जहाजांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

इराणकडून होर्मुझ पुन्हा बंद

शनिवारी सकाळी इराणने होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केल्याची घोषणा केली होती. मात्र आता पुन्हा होर्मुझ बंद करण्यात आला आहे. इराणचे म्हणणे आहे की अमेरिकेने इराणी बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीच्या प्रत्युत्तरात हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या मार्गावर पुन्हा कडक नियंत्रण लागू करण्यात आले आहे. त्यानंतर आता व्यापारी जहाजांना होर्मुजमधून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत