AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 वर्षाच्या मैत्रीचा रशियाला विसर, भारतासाठी रशिया उभा नाहीच, मोठा दणका, निर्णय घेत..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच रशियाच्या तेलाची मागणी वाढली आहे. मात्र, यादरम्यान रशियाकडून भारताला मोठा धक्का देण्यात आला.

70 वर्षाच्या मैत्रीचा रशियाला विसर, भारतासाठी रशिया उभा नाहीच, मोठा दणका, निर्णय घेत..
Russia India
| Updated on: Mar 15, 2026 | 9:04 AM
Share

इराण आणि अमेरिकेत भयंकर स्थिती आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. जे आखाती देश अगोदर सुरक्षित वाटत त्याठिकाणी मोठे हल्ले होत आहेत. होर्मुज खाडी इराणकडून बंद ठेवण्यात आले. ज्या देशांच्या जहाजांना परवानगी नाही, असे जहाज जात असतील तर थेट पेटवून दिले जात आहेत. या युद्धाला 15 दिवस झाले पण युद्ध काही थांबत नाही. यासोबतच इराणकडून मोठे संकेत देण्यात आले. काही महिने काही वर्षही युद्ध सुरू राहू शकते, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या युद्धात इतर देश संकट झाले. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. 200 प्रति बॅरल तेलाचा भाव होईल, असेही इराणकडून सांगण्यात आले. कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यांना अजिबात यश मिळत नाही. रशियाकडून जगातील देशांनी तेल खरेदी करावे, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत अनेक देशांच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे रशियाच्या संपर्कात आहे. मात्र, यादरम्यान रशियाने भारतासोबतची 70 वर्षांची मैत्री विसरून भारताला देखील बाजार भावाप्रमाणेच तेल खरेदी करावे लागेल असे सांगितले. भारत बाजारा भावाप्रमाणेच रशियाकडून तेल खरेदी करत आहे. यापूर्वी रशिया भारताला त्यांच्या तेलावर मोठी सूट देत. मात्र, आता रशियाची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे.

जवळपास 50 टक्के अतिरिक्त पैसे भारताला मोजावे लागत आहे. रशियन तेलावरील जवळपास सर्वच सूट काढण्यात आली. या मुद्द्यावर रशियन सरकारशी चर्चा सुरू आहे. मात्र, रशिया आपल्या भूमिकेवर ठाम आहे. निर्णय रशियाकडून बदलला जात नाहीये. भारताने सातत्याने तणाव कमी करण्याचे आणि युद्ध संपण्याची भूमिका घेतली. भारतात इराण आणि अमेरिका युद्धामुळे एलपीसी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतात थेट व्यावसायिक सिलेंडर वितरण बंद करण्यात आले.

यादरम्यानच्या काळात भारताने इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत चर्चा केली. जेणेकरून ऊर्जा सुरक्षा आणि सुरक्षित सागरी वाहतूक यासह भारताच्या प्राधान्यांना अधोरेखित करता येईल. रशियाने अगोदरच भारताला दणका देत स्पष्ट केले की, भारताला पूर्वीप्रमाणे कच्च्या तेलामध्ये सूट मिळणार नाही. सध्याच्या घडीला रशियाच्या तेलाची जगभरात प्रचंड मागणी आहे. या युद्धात सर्वाधिक फायदा रशियाचाच होत आहे. पूर्वीप्रमाणे सूट मिळावी, याकरिता भारताकडून अजूनही रशियासोबत चर्चा सुरू आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.