AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, ट्रिब्युनलचा महत्वाचा निर्णय नाकारला

जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित असलेला लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने नाकारला आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे.

भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, ट्रिब्युनलचा महत्वाचा निर्णय नाकारला
pakistan indus water treaty
| Updated on: Jun 27, 2025 | 11:15 PM
Share

भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित असलेला लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने नाकारला आहे. हे ट्रिब्युनल 1960 च्या सिंधू पाणी करारांतर्गत स्थापन करण्यात आले होते. आता भारताने हे ट्रिब्युनल बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. सरकारने सांगितले की, या न्यायाधिकरणाच्या कोणत्याही निर्णयाला कायदेशीर मान्यता नाही.

भारत सरकारने काय म्हटले?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा सिंधू जल करार स्थगित केला होता. भारत सरकारने ट्रिब्युनलबाबत एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले की, ‘या न्यायाधिकरणाची स्थापना स्वतःच सिंधू पाणी कराराच्या नियमांचे उल्लंघन आहे. भारताने याला कधीही मान्यता दिलेली नाही, त्यामुळे या ट्रिब्युनलचा निर्णय बेकायदेशीर आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत आम्ही कराराचे नियम पाळणार नाहीत.’ यामुळे पाकिस्तानला दणका बसला आहे.

पाकिस्तानवर केला गंभीर आरोप

भारताने यावर बोलताना पाकिस्तानवर गंभीर आरोप केला आहे. भारताने म्हटले की, ‘दहशतवादाबाबतची आपली जबाबदारी टाळण्यासाठी पाकिस्तानने केलेली ही एक युक्ती आहे. ही लवाद प्रक्रिया पाकिस्तानच्या जुन्या धोरणाचा भाग आहे. पाकिस्तान नेहमी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर याचा गैरवापर करते.’

सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड नाही

भारताने पुढे बोलताना म्हटले की, ‘कोणताही बेकायदेशीर ट्रिब्युनल देशाच्या सार्वभौमत्वासाठी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. पाकिस्तानचा हा प्रयत्न आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. भारत राष्ट्रीय सुरक्षा जपण्यासाठी आणि आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

त्याचबरोबर भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारताने हेही सांगितले आहे की, भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही आणि विकासाच्या मार्गावर पुढे जात राहील.

लवाद न्यायाधिकरण म्हणजे काय?

लवाद न्यायाधिकरण ज्याला लवाद आयोग, लवाद समिती किंवा लवाद परिषद असेही म्हणतात. हे न्यायाधीशांचे एक पॅनेल आहे ज्यांना कोणत्याही प्रकारचा वाद सोडवण्यासाठी बोलावले जाते. परंतु या कराराशी संबंधित मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा आहे, यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचे मत ऐकले जाणार नाही असं भारताने ठणकावून सांगितले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.