AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक थेंबही पाणी देणार नाही.. पाकिस्तान तरसला, भारत बांधणार 2 मोठे बोगदे, तब्बल 2600..

भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा मोठा थयथयाट बघायला मिळत आहे. पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले. त्यामध्येच भारताने मोठा निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला. ज्याने पाकिस्तानच्या हाती आता काहीच राहिले नाही.

एक थेंबही पाणी देणार नाही.. पाकिस्तान तरसला, भारत बांधणार 2 मोठे बोगदे, तब्बल 2600..
Indus Water Treaty
| Updated on: May 30, 2026 | 7:52 AM
Share

भारताने सिंधु जल करार स्थगित करून आता वर्ष होत आहे. मात्र, जागतिक मंचावर फक्त थयथयाटाशिवाय पाकिस्तान काहीच करू शकला नाही. जागतिक न्यायालयाने निकाल जरी या प्रकरणात पाकिस्तानच्या बाजूने दिला असला तरीही भारताने त्या निकालाला केराची टोपली दाखवली आहे. यासोबतच भारताने फक्त पाकिस्तानला जाणारे पाणीच रोखले नाही तर यासोबतच एक मोठा प्लॅन तयार केला. ज्याने पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी इतर ठिकाणी वळवले जात आहे. त्याकरिता 2600 करोड भारत खर्च करत आहे. पाण्यासाठी तरसणारा पाकिस्तान सर्वकाही बघत आहे. पण भारताचे काहीच वाकडे करू शकत नाही. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित केला. ज्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला. पाणी रोखल्याने पाकिस्ताना भीषण स्थिती आहे. अनेक प्रयत्न या करारावरील स्थगिती काढण्याकरिता पाकिस्तानने केले.

भारताने पाकिस्तानात जाणारे पाणी भारतात वळवण्याकरिता मोठे काम हाती घेतले. याला वेळ आणि पैसा दोन्ही लागणार आहे. सिंधु जल करारानुसार, सहा नद्यांपैकी तीन सिंधु, झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यावर 80 टक्के अधिकार पाकिस्तानचा. ब्यास, सतलुज आणि रावी नदीच्या पाण्यावर 80 टक्के अधिकार भारताचा. मात्र, भारताने पहलगाम हल्ल्यानंतर हा करार स्थगित केला आणि पाकिस्तानात जाणारे पाणी रोखले.

पुढील तीन वर्षात या नद्यांचे पाणी भारतात वापरले जाईल. पण पाणी रोखणे साधे काम नाही. चेनाबचे पाणी व्याबमध्ये आणले जाईल. सलाल बंधाऱ्यातील गाळ काढण्याकरिता तब्बल 2600 करोडचा खर्च आहे. सलाल हायडाइलेक्ट्रिक योजनेला तब्बल 268 करोडचा खर्च येणार आहे. येथे नवीन डायवर्जन कम सेडिमेंट बायपास टनल बनेल. दोन मोठे बोगदे बनणार आहेत. पहाडावरील मातीमुळे सलाल धरणामध्ये गाळ जमा आहे.

भारताकडे सर्व योजना तयार आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले. हेच नाही तर पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार असून त्याच्या नशीबात साधे पाणीही नसणार आहे. भारतावर पहलगाम हल्ला करून पाकिस्तानने अत्यंत मोठी चूक केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तानला माफ करणार नाही. भारताने सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानात मोठी पाणी टंचाई बघायला मिळतंय.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा