AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा

India Iran Relation : इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. मात्र भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी भारताला दिलासा देणारे विधान केले आहे.

भारताचं टेन्शन मिटलं! इराणकडून भारताला सर्वात मोठा दिलासा, थोड्याच वेळात होणार घोषणा
india iran RelationImage Credit source: Google
| Updated on: Mar 13, 2026 | 8:01 PM
Share

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगातील तेल पुरवठ्यावर परिणाम झाल आहे. इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांना प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांवरही याचा परिणाम झाला आहे. अशातत आता भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी भारताला दिलासा देणारे विधान केले आहे. भारताच्या जहाजांना हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यास परवानगी मिळू शकते असं फतहाली यांनी सांगितलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणकडून भारताला मोठा दिलासा

इराणने हार्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजांबाबत आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. जहाजांना या मार्गाने प्रवास न करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच फतहाली यांना विचारण्यात आले की, भारताला होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळेल का, यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘हो, कारण भारत आमचा मित्र आहे. दोन-तीन तासांत असे घडताना दिसेल.’ या जलमार्गावर परिणाम झालेला असताना इराणकडून हे विधान आल्याने आता भारताची सर्वात मोठी डोकेदुखी मिटण्याची शक्यता आहे.

भारत आणि इराणचे हितसंबंध एकसारखे

भारताला होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाता येईल का? असा थेट प्रश्न विचारल्यावर मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, ‘हो, हो, भविष्यात तुम्ही असे पाहू शकता. मला वाटते की दोन-तीन तासांत असे काही घडू शकते.’ फतहाली यांनी भारताला इराणसाठी एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘या भागात इराण आणि भारताचे हितसंबंध एकसारखे आहेत, असे आम्हाला वाटते.’

भारत आम्हाला मदत करतो

भारत-इराण यांच्यातील संबंधांवर बोलताना मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, ‘हे आमचेही दु:ख आहे आणि त्यांचेही. त्यामुळेच भारत सरकार आमची मदत करते आणि आम्हीही भारत सरकारला मदत केली पाहिजे, कारण आमचे परस्पर विश्वास आणि समान हितसंबंध आहेत. या प्रदेशात भारत आणि इराणचे सामायिक हित आहेत.’ अशातच आता इराणमधील सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी भारतातील इराणी दूतावासाला दोन्ही देशांमधील संबंध मजबूत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.