AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकचा तो दावा फुसका, शरीफ आणि मुनीरला तोंड लपवण्याची वेळ, पाकिस्तानी पत्रकाराकडून मोठी पोलखोल

Moeed Mirzada Reveals : ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांची उरली सुरली इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली. पाकडे हे खोटारडे असल्याचे अनेकदा उघड झाले आहेत. भारताविरोधात विजय मिळवल्याचा कांगावा अंगलट आल्यानंतर त्यांचा हा दावा पण फुसका निघाला.

Operation Sindoor : पाकचा तो दावा फुसका, शरीफ आणि मुनीरला तोंड लपवण्याची वेळ, पाकिस्तानी पत्रकाराकडून मोठी पोलखोल
मोईद मिरजादाImage Credit source: गुगल
| Updated on: May 17, 2025 | 2:31 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढला. 6-7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकला मोठा हादरा दिला. त्यानंतर लागलीच पाकने ड्रोन आणि मिसाईल डागली. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने ते हवेतच नष्ट केले. उलट कारवाईत भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. नूर यार खान एअरबेससह पाकिस्तानातील 11 हवाईतळ नष्ट केले. सुरुवातीला आम्ही भारताचे मोठे नुकसान केले, आमचे काही एक नुकसान झाले नाही असा दावा करणारे पाकडे आता आमचे खूप मोठे नुकसान झाल्याचे कबुली देत आहेत. तर पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार मोईद मिरजादा यांनी पाकिस्तानच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.

मिरजादा यांची पाकला चपराक

आपल्या मिसाईल आणि ड्रोनने शत्रू राष्ट्राचे मोठे नुकसान केले, अशा वल्गणा सुरुवातीला पंतप्रधान शाहबाज शरीफ याने केल्या. पाकिस्तान जिंकला, असा पोकळ ढोल त्याने बडवला. पण अवघ्या 8 व्याच दिवशी शरीफला पाकचे भारताने कंबरडे मोडल्याचे मान्य करावे लागले. त्यातच आता ज्येष्ठ पत्रकार मोईद मिरजादा यांनी पाकच्या एकाही मिसाईलने भारताचे नुकसान केले नाही असा दावा केला आहे. या दाव्यासाठी त्यांनी सॅटेलाईज इमेज्सचा पुरावा देऊन पाकच्या कानाखाली सणसणीत जाळ काढला आहे.

काय म्हणाले मिरजादा

नियो टाईम्सच्या आधारे मिरजादा यांनी पाकिस्तानचा खोटा दावा हाणून पाडला. भारताचे नुकसान केल्याचा पाकचा खोटा प्रचार मिरजादा यांनीच उघडा केला. त्याची पोलखोल केली. दोन्ही देशांनी एकमेकांचे खूप नुकसान केल्याचा दावा केला आहे. पण जी सॅटेलाईट छायाचित्र समोर आली आहेत. मॅक्सल टेक्नॉलॉजीच आणि प्लॅनेट लॅबने ही छायाचित्र पुढे आणली आहेत. त्यानुसार, भारताचे मोठे नुकसान झालेले नाही. पाकच्या एकाही मिसाईलने भारतात नुकसान केलेले नाही, हे स्पष्ट होत आहे. तर भारताने ज्या वेगवेगळ्या मिसाईल डागल्या. त्यांनी 24 ठिकाण टार्गेट केली. त्यातील काही पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानातील होती. या मिसाईलने त्यांचे लक्ष्य अचूक भेदले. त्या त्या इमारतींना बरोबर लक्ष्य केले. ब्राम्होस या भारत-रशियन मिसाईलने पण अचूक निशाणा साधला, असे मिरजादा म्हणाले.

भारतीय लष्कराने पत्र परिषदेत सॅटेलाईट फोटोतून पाकिस्तानचे झालेले नुकसान दाखवलेले आहे. पण मिरजादा यांच्या मते, त्यांनी अमेरिकेच्या सॅटेलाईट इमेजवर विश्वास ठेवला आणि त्यात पाकच्या हवाईतळावरील धावपट्टीचे मोठे नुकसान झाल्याचे, एअरबेसचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान काहीच नुकसान झाले नाही असे म्हणतो, तर मग त्यांनी फोटो दाखवावेत असे आवाहन मिरजादा यांनी केले. तर भारताचे आदमपूर एअरबेस उडवल्याचे, नष्ट केल्याचा दावा खोटा असल्याचे मिरजादा म्हणाले. पाकचे मिसाईल कधीच लक्ष्य भेद करत नाही हे अगोदर सुद्धा उघड झाल्याचे मिराजादा म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.