AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War : जग हादरलं! पाकिस्तानची भारताला थेट युद्धाची धमकी, पडद्यामागे मोठ्या हालचाली?

ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानला धूळ चारली. मात्र पाकिस्तानचा हेकेखोरपणा अजूनही संपलेला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आता भारताला थेट धमकी दिली आहे. त्यामुळे भारत या धमकीकडे नेमकं कसं पाहणार हे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

India Pakistan War : जग हादरलं! पाकिस्तानची भारताला थेट युद्धाची धमकी, पडद्यामागे मोठ्या हालचाली?
khawaja asif on india pakistan war
| Updated on: Oct 08, 2025 | 7:48 PM
Share

India Pakistan War : पहलगामवर हल्ला केल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. या मोहिमेनंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. दरम्यान, भारताशी स्पर्धा करताना अनेकदा तोंडावर आपटल्यानंतरदेखील पाकिस्तान आपले कारनामे थांबवताना दिसत नाहीये. आता पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली आहे. या थेट धमकीनंतर आता जगात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच समा टीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानचे भारतासोतबचे संबंध यावर भाष्य केले. त्यांनी भारतासोबत युद्ध होऊ शकते, अशा आशयाचे विधान केले. सोबतच औरंगजेबाचा शासनकाळ वगळता भारत कधीच एकसंध नव्हता, असेही मत त्यांनी यावेळी केली.

भारत कधीच एकसंध देश नव्हता

काही दिवसांपूर्वी भारतीय आर्मीचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला होता. जगाच्या नकाशावर पाकिस्तानला आपले अस्तित्त्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यांनी दहशतवादाचे समर्थन करणे थांबवावे, असे द्विवेदी म्हणाले होते. त्यानंतर आता आसिफ यांनी मुलाखतीत भारतासोबतच्या युद्धावर भाष्य केले. “भारत हा कधीच एकसंध प्रदेश नव्हता. त्या देशात कधीकाळी 540 संस्थाने होती. आम्ही पाकिस्तानीची निर्मिती करताना एक विशेष दृष्टीकोन समोर ठेवलेला आहे. अल्लाहच्या कृपेने आमच्यात युद्ध होऊ नये. पण हे युद्ध होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर यावेळी पहिल्यापेक्षा जास्त चांगले परिणाम दिसतीलस,” असे आसिफ म्हणाले आहेत.

भारत नेमकी काय भूमिका घेणार?

दरम्यान, याआधीही आसिफ यांनी भारताला धमकी दिलेली आहे. ऑपेरशन सिंदूरनंतर भारतातील जनमत सरकारच्या विरोधात गेले आहे. सरकारने आपली विश्वासार्हता गमवलेली आहे, असे आसिफ म्हणाले होते, असे त्यावेळी आसिफ एक्सच्या माध्यमातून म्हणाले होते. आता पुन्हा एकदा आसिफ यांनी भारतासोबत युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानाकडे भारत कसा पाहतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन