AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War : जग हादरलं! पाकिस्तानची भारताला थेट युद्धाची धमकी, पडद्यामागे मोठ्या हालचाली?

ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानला धूळ चारली. मात्र पाकिस्तानचा हेकेखोरपणा अजूनही संपलेला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आता भारताला थेट धमकी दिली आहे. त्यामुळे भारत या धमकीकडे नेमकं कसं पाहणार हे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

India Pakistan War : जग हादरलं! पाकिस्तानची भारताला थेट युद्धाची धमकी, पडद्यामागे मोठ्या हालचाली?
khawaja asif on india pakistan war
| Updated on: Oct 08, 2025 | 7:48 PM
Share

India Pakistan War : पहलगामवर हल्ला केल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. या मोहिमेनंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. दरम्यान, भारताशी स्पर्धा करताना अनेकदा तोंडावर आपटल्यानंतरदेखील पाकिस्तान आपले कारनामे थांबवताना दिसत नाहीये. आता पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली आहे. या थेट धमकीनंतर आता जगात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतेच समा टीव्हीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानचे भारतासोतबचे संबंध यावर भाष्य केले. त्यांनी भारतासोबत युद्ध होऊ शकते, अशा आशयाचे विधान केले. सोबतच औरंगजेबाचा शासनकाळ वगळता भारत कधीच एकसंध नव्हता, असेही मत त्यांनी यावेळी केली.

भारत कधीच एकसंध देश नव्हता

काही दिवसांपूर्वी भारतीय आर्मीचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला होता. जगाच्या नकाशावर पाकिस्तानला आपले अस्तित्त्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यांनी दहशतवादाचे समर्थन करणे थांबवावे, असे द्विवेदी म्हणाले होते. त्यानंतर आता आसिफ यांनी मुलाखतीत भारतासोबतच्या युद्धावर भाष्य केले. “भारत हा कधीच एकसंध प्रदेश नव्हता. त्या देशात कधीकाळी 540 संस्थाने होती. आम्ही पाकिस्तानीची निर्मिती करताना एक विशेष दृष्टीकोन समोर ठेवलेला आहे. अल्लाहच्या कृपेने आमच्यात युद्ध होऊ नये. पण हे युद्ध होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर यावेळी पहिल्यापेक्षा जास्त चांगले परिणाम दिसतीलस,” असे आसिफ म्हणाले आहेत.

भारत नेमकी काय भूमिका घेणार?

दरम्यान, याआधीही आसिफ यांनी भारताला धमकी दिलेली आहे. ऑपेरशन सिंदूरनंतर भारतातील जनमत सरकारच्या विरोधात गेले आहे. सरकारने आपली विश्वासार्हता गमवलेली आहे, असे आसिफ म्हणाले होते, असे त्यावेळी आसिफ एक्सच्या माध्यमातून म्हणाले होते. आता पुन्हा एकदा आसिफ यांनी भारतासोबत युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानाकडे भारत कसा पाहतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.