AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या इशाऱ्यावरच… पाकिस्तानचा भारतावर सर्वात गंभीर आरोप, कठपुतली दिल्ली..

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव बघायला मिळाला. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करताना दिसले. अफगाणिस्तानसोबत वाद सुरू असताना पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केला.

भारताच्या इशाऱ्यावरच... पाकिस्तानचा भारतावर सर्वात गंभीर आरोप, कठपुतली दिल्ली..
khawaja asif
| Updated on: Oct 29, 2025 | 9:35 AM
Share

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मोठा तणाव बघायला मिळाला. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत होती. साैदी अरेबियासह कतारने या युद्धात हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्यास सांगितले. यादरम्यान अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या 28 लष्कर चाैक्यावर ताबा मिळवला. 58 सैनिक पाकिस्तानचे युद्धात ठाक मारल्याचेही अफगाणिस्तानने म्हटले. मागील काही दिवसांपासून भारत- अफगाणिस्तान यांच्यातील जवळीकता वाढलीये आणि हीच पोटदुखी पाकिस्तानची आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील मैत्रीमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानवर दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करण्याचा आरोप केला आहे.

इस्लामाबादवरील कोणत्याही हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी आसिफ यांनी दिली आहे. अफगाणिस्तानसोबतच्या तणावात पाकिस्तान भारतावर बिनबुडाचे आरोप करताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याला पळू की सळो करून सोडले होते. पाकिस्तानच्या काही सैनिकांना अफगाणिस्तानने ओलीस ठेवले आहे. अफगाणिस्तानला थेट उत्तर न देता पाकिस्तान भारताला टार्गेट करतोय.

एका मुलाखतीमध्ये बोलताना आसिफ यांनी म्हटले की, काबूलमधील कठपुतली आणि कठपुतलीचे कलाकार दिल्लीतून नियंत्रित केले जातात. सीमेवर झालेल्या पराभवाची भरपाई करण्यासाठी भारत हाच अफगाणिस्तानचा वापर करत आहे, यावेळी आसिफ यांचा जळफळाट त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. भारतावर थेट गंभीर आरोप करताना आसिफ हे दिसत आहेत. हेच नाही तर यादरम्यान त्यांनी थेट तालिबानला धमकी दिली.

अफगाणिस्तानबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, इस्लामाबादकडे बघितले तर आम्ही त्यांचे डोळे उपटून टाकू… पाकिस्तानने अगोदर अफगाणिस्तानच्या राजधानीवर हल्ला केला. त्यानंतर त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या लष्कर चाैक्यांना टार्गेट करत मोठा हल्ला केला. त्यांच्या टार्गेटवर होती ती म्हणजे पाकिस्तानी लष्कर. या हल्ल्याची अनेक व्हिडीओ आणि फोटोही पुढे आली. मात्र, या वादात पाकिस्तान भारताला ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत