AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलकांनी पाकिस्तान सरकारचं नाक दाबलं, हजारो लोक रस्त्यावर… 100 शहरांमध्ये खळबळ

Pakistan : पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे, संपूर्ण देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून संपूर्ण देशात विविध मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी पाकिस्तान सरकारचं नाक दाबलं, हजारो लोक रस्त्यावर... 100 शहरांमध्ये खळबळ
Protest in Pakistan Image Credit source: Google
| Updated on: Apr 18, 2026 | 10:40 PM
Share

पाकिस्तान सरकारची झोप उडवणारी बातमी आहे. संपूर्ण देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून संपूर्ण देशात विविध मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आंतरराष्ट्रीय शेतकरी संघर्ष दिवस निमित्त पाकिस्तान किसान राबिता कमिटीच्या वतीने करण्यात आले. माध्यमांच्या अहवालानुसार, 100 हून अधिक शहरांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांनी आपल्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच गव्हासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) प्रति मन 4000 पाकिस्तानी रुपये दर निश्चित करण्याची मागणी केली.

कॉर्पोरेट शेती मॉडेलला विरोध

या आंदोलनात शेतकऱ्यांनी कॉर्पोरेट शेतीच्या मॉडेल विरोध केला, तसेच बटाईवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या बेदखली नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांनी सरकारने गहू खरेदी 11 खासगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या योजनेलाही त्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे लहान शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि त्यांची परिस्थिती अधिक कमकुवत होईल. पंजाब प्रांतातील लाहोर, मुल्तान, भावलपूर, सहिवाल, सरगोदा सह विविध भागात आंदोलन झाले. तसेच सिंध प्रांतातील हैदराबाद, सुक्कुर, लारकानास येथेही शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

2 वर्षांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पाकिस्तानातील खैबर पख्तुनवातील पेशावर, स्वाट, एबोटाबाद, बन्नू आणि बलुचीस्तानमधील क्वेटा, कलात यासह वेगवेगळ्या शहरांमध्येही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अशा प्रकारे संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा संताप दिसून आला. लाहोरमध्ये झालेल्या सभेत PKRC च्या महासचिव रिफत मकसूद यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले की गेली 2 वर्षे शेतकऱ्यांसाठी अत्यंत नुकसानकारक ठरली आहेत. त्यांनी आरोप केला की, सरकार ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असून लहान शेतकऱ्यांऐवजी कॉर्पोरेट हितांना प्राधान्य देत आहे.

आंदोलन आणखी तीव्र होईल

शेतकरी संघटनांनी पाकिस्तानी सरकारला इशारा दिला आहे की, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होईल. दरम्यान, पाकिस्तानमधील शेतकरी आधीच वाढता खर्च, पिकांच्या अस्थिर किंमती आणि हवामानाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांची अडचण आणखी वाढली आहे. आता आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!