AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंदच !, २४ मे पर्यंत मुदतीत झाली वाढ..

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांना आपआपल्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. मात्र, यात पाकिस्तान पेक्षा आपल्या भारतीय हवाई कंपन्यांचे जास्त नुकसान होत आहे.

भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंदच !, २४ मे पर्यंत मुदतीत झाली वाढ..
air plane sky
| Updated on: Apr 22, 2026 | 11:33 PM
Share

इस्लामाबाद: पाकिस्तानची आणि भारतात पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेले ऑपरेशन सिंदूर यामुळे तणाव कायम आहे. आता पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना लावलेले निर्बंध आता मंगळवारी २४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या विमानांना आपली हवाई हद्द बंद करण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानी हवाई क्षेत्र २४ एप्रिल २०२५ पासून भारतीय विमानांना बंद आहे. याला उत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानी विमानांच्या प्रवेशावर बंदी घातली असून ती ३० एप्रिल २०२५ पासून लागू आहे.

पाकिस्तानने नोटममध्ये काय लिहिले ?

पाकिस्तानी विमान वाहतूक प्राधिकरणाने ‘नोटीस टू एअरमन’ (नोटम)मध्ये म्हटले आहे की सर्व भारतीय नोंदणीकृत, करारावर घेतलेल्या वाणिज्यिक आणि सैन्य विमानांना २४ मे २०२६ च्या सकाळी पाच वाजेपर्यंत पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यात अनुमती नसणार आहे. ही नोटीस आधीची नोटिसीची कालमर्यादा २४ एप्रिल संपण्याआधी काही दिवसांपूर्वी जारी केली आहे.

भारतीय विमान कंपन्याचे नुकसान –

पाकिस्तानी हवाई हद्दीत भारतीय विमानांना बंदी घातल्याला एक वर्षे झाले आहे. ज्यामुळे भारतीय विमानांना विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर जाण्यासाठी दीर्घ हवाई मार्गांचा स्वीकार करावा लागत आहे. यामुळे भारतीय विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारण भारतीय हवाई उड्डाण बाजार पाकिस्तानहून किती पट अधिक आहे. भारताने पाकिस्तानी विमानांना २४ एप्रिलच्या सकाळी ५.३० वाजेपर्यंत आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास रोखलेले आहे. या निर्बंधांना आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर तणाव कायम

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात उचललेल्या अनेक पावलांमुळे तणाव आहे. हे निर्बंध सुरुवातीला २४ मे २०२५ पर्यंत होते. मात्र, त्यास दर महिन्याला वाढवण्यात आले आहे. हवाई क्षेत्राला आधी १९९९ च्या कारगित संघर्ष आणि २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतरही बंद करण्यात आले होते.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.