AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanique Rahman: तारिक रहमान कोण? चौथ्या वर्षीच तुरुंगात, ते आता बांगलादेशाचे पंतप्रधान, राजकीय वळणाची कहाणी काय?

Tarique Rahman Bangladesh New Prime Minister: तारिक रहमान यांच्या BNP पक्षाने बांगलादेशात महाविजय मिळवला आहे. अर्थात या विजयाला संशयाची झालर आहेच. कारण यंत्रणांनी या पक्षासाठी काम केल्याचा दावा करण्यात येतो. पण तारिक रहमान यांचा जीवनपट, हा एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे.

Tanique Rahman: तारिक रहमान कोण? चौथ्या वर्षीच तुरुंगात, ते आता बांगलादेशाचे पंतप्रधान, राजकीय वळणाची कहाणी काय?
तारिक रहमानImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 13, 2026 | 9:51 AM
Share

Tarique Rahman Bangladesh New Prime Minister: तारिक रहमान यांचा पक्ष BNP ने बांगलादेशातील 13 व्या सार्वजनिक निवडणुकीत महाविजय मिळवला. तारिक रहमान हे जियाऊर रहमान आणि खालिदा जिया यांचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब हे बांगलादेशातील सर्वात प्रभावशाली आहे. खालिदा जिया यांच्या मृत्यूनंतर रहमान हे BNP पक्षाचे प्रमुख झाले. त्यांनी पहिल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. अर्थात त्यांच्या या विजयाला संशयाची दाट झालर सुद्धा आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यानंतर यंत्रणा आणि कट्टरतावाद्यांचा रहमान यांना पाठिंबा होता हे काही लपून राहिले नाही. तारिक रहमान यांना गेल्या 17 वर्षांपासून परदेशात रहावे लागले. ते त्यांच्या वतनाला मुकले होते. पण पुन्हा एकदा सरकारची सूत्रं त्यांच्या हाती आली आहे. आता ते बांगलादेशाला दुसरा पाकिस्तान करतात की नवीन उंचीवर नेतात हे येणारा काळच ठरवेल.

तारिक यांचा जीवनप्रवास

तारिक रहमान यांना बांगलादेशाच्या राजकारणात तारिक जिया या नावाने ओळखले जाते. त्यांच्या आईचा प्रभाव त्यातून स्पष्ट दिसतो. त्यांचे कुटुंब हे सक्रिय राजकारणात पूर्वीपासूनच होते. ते जियाउर रहमान आणि खालिदा जिया यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 1967 मध्ये झाला होता. त्यावेळी बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान होता. 1971 च्या मुक्तीवाहिनीच्या संघर्षात मुक्ती संग्रामात बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी तारिक केवळ चार वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांचा पक्ष बीएनपी त्यांना युद्धातील सर्वात कमी वयाचा बंदिवान म्हणून त्यांचे कौतुक करतात.

त्यांचे वडील जियाउर रहमान हे लष्कराचे कमांडर होते. 1975 मध्ये त्यांनी तख्तापालट केला आणि सत्तेवर मजबूत पकड मिळवली. या घटनेमुळे बांगलादेशाच्या राजकारणात खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्या कुटुंबात राजकीय वैर झाले. या घटनेला बेगमची लढाई म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशावर शेख हसीना यांची एकहाती सत्ता होती. पण आता त्यांना भारतात शरण यावे लागलेले आहे.

जेव्हा तारिक रहमान हे केवळ 15 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील जियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आईच्या छत्रछायेत ते मोठे झाले. खालिदा जिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. दोन्ही बेगममध्ये राजकीय द्वंद सुरूच होते. 23 व्या वर्षापर्यंत तारिक यांनी ढाका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय विषयावर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

2007अटक आणि 2008 मध्ये सोडला देश

2007 मध्ये तारिक रहमान यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. राजकारणात सक्रिय राहणार नाही आणि देश सोडणार या अटींवर त्यांची सुटका झाल्याचे मानले जाते. त्यांची सुटका झाल्यानंतर ते 2008 मध्ये लंडनाला गेले. आईच्या निधनानंतर इकडं शेख हसीना विरोधात विद्यार्थी आंदोलनाचं निमित्त करून त्यांना सत्तेतून दूर करण्यात आले. शेख हसीनांना देश सोडून पळ काढावा लागला. एक वर्षांपासून या देशात हंगामी सरकार कार्यरत होते. आता झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बीएनपीचा विजय झाला. तर तारिक रहमान नवीन पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतील.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.