AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

45 दिवसात ट्रम्प यांची मध्यस्थी फसली, हिंदू मंदिरावरुन भिडलेल्या दोन देशांमध्ये Air Strike मुळे युद्धाची ठिणगी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत युद्धविराम घडवून आणल्याचे मोठमोठे दावे करत असतात. पण अवघ्या 45 दिवसात दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्राचीन हिंदू मंदिरावरुन या दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला होता.

45 दिवसात ट्रम्प यांची मध्यस्थी फसली, हिंदू मंदिरावरुन भिडलेल्या दोन देशांमध्ये Air Strike मुळे युद्धाची ठिणगी
F-16
| Updated on: Dec 08, 2025 | 9:33 AM
Share

थायलंड आणि कंबोडिया दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. थायलंडने पुन्हा एकदा कंबोडियाच्या सीमेवर एअर स्ट्राइक केला आहे. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडवला होता. थायलंडने सीजफायरच उल्लंघन करत एअर स्ट्राइक केला. दोन्ही देशांनी परस्परांवर सीजफायरचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. कंबोडियाने आमच्यावर हल्ला केला. त्यात एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले. कंबोडियावरील एअर स्ट्राइक हा त्याचं हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे असं एका थाई सैन्य अधिकाऱ्याने सांगितलं. पूर्वेकडील उबोन रत्चाथानीच्या दोन भागात हिंसाचार भडकल्याचं थाई सैन्य अधिकाऱ्याने सांगितलं. यात एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला. चार जखमी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून थायलंडने कंबोडियावर एअर स्ट्राइक केला.

कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने हवाई हल्ल्याची पुष्टी केली आहे. 8 डिसेंबर 2025 च्या सकाळी जवळपास 5.04 मिनिटांनी थाई सैन्य दलाने प्रेह विहियर प्रांताच्या सेस क्षेत्रात कंबोडियाई सैनिकांवर हल्ला केला. स्टेटमेंटनुसार, कंबोडियाने पलटवार केला नाही. थायलंडकडून करण्यात आलेल्या अमानवीय आणि क्रूर कारवाईचा आम्ही कठोरता कठोर निषेध करतो, असं कंबोडियाने म्हटलं आहे. थायलंडकडून करण्यात आलेला हा हवाई हल्ला 26 ऑक्टोंबरला झालेल्या सीजफायरचं उल्लंघन आहे, असही कंबोडियाने म्हटलं आहे.

त्यानंतर पाच दिवस युद्ध चाललं

दोन्ही देशांमध्ये जुलै महिन्यात सीमावाद भडकला होता. त्यानंतर पाच दिवस युद्ध चाललं. त्यानंतर मलेशियाई पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि ट्रम्प यांच्या मध्यस्थतेने युद्धविराम झाला. दोन्ही नेत्यांनी ऑक्टोंबर महिन्यात कुआलालंपुर येथे दोन्ही देशांमध्ये शांती करार घडवून आणला.

48 लोकांचा मृत्यू झालेला

जुलै महिन्यात दोन्ही देशांमध्ये हिंसक झडपा झाल्या होत्या. दोन्ही शेजाऱ्यांनी परस्परांवर रॉकेट हल्ले केले होते. यात हल्ल्यात कमीत कमी 48 लोकांचा मृत्यू झालेला. जवळपास 3 लाख लोक अस्थायी काळासाठी विस्थापित झाले होते. डोनाल्ड ट्रम्प हे जगातील अनेक देशात सीजफायर घडवून आणल्याचा दावा करतात. ऑपरेशन सिंदूरवेळी आपण युद्धविराम घडवून आणल्याचा त्यांचा दावा आहे. पण भारताने हे कधीच मान्य केलेलं नाही.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.