AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत आहे शत्रूचा कर्दनकाळ,रशिया भारताला S-400 चे उरलेले दोन स्क्वॉड्रन केव्हा देणार, काय आहे अपडेट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान रशियाने भारताला दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची दाणादाण उडविली होती. या एस-400 स्क्वाड्रनचा उर्वरित ताफा लवकरच भारताला रशिया देणार आहे. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहीती दिली आहे.

येत आहे शत्रूचा कर्दनकाळ,रशिया भारताला S-400 चे उरलेले दोन स्क्वॉड्रन केव्हा देणार, काय आहे अपडेट
| Updated on: Jun 27, 2025 | 4:28 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या धुमश्चक्रीत रशियाने आपल्याला दिलेल्या एअर डीफेन्स सिस्टीम S-400 ने कमाल केली होती. पाकिस्तानच्या अनेक क्षेपणास्र आणि ड्रोनचे हल्ले रशियन एअर डीफेन्स सिस्टीम S-400 परतवून लावले होते. या रशियन एअर डिफेन्स सिस्टीमचे उर्वरित स्क्वॉड्रन आता लवकरच भारताला मिळणार आहे. या बाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

एस–400 एअर डिफेन्स सिस्टमचा चौथा आणि पाचवा स्क्वॉड्रनची डिलिव्हरी रशिया- युक्रेन युद्धामुळे रखडली होती. अलिकडेच चीनमध्ये किंगदाओ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह आणि एंड्री बेलौसेव्ह यांच्यात या संदर्भात द्विपक्षीय बैठकीत चर्चा पार पडली. रशियाने गुरुवारी आश्वासन दिले की ते एस-400 एअर डिफेन्स सिस्टमच्या उर्वरित दोन स्क्वाड्रन साल 2026-27 मध्ये भारताला देणार आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये याच एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानला धुळ चारली होती.

पाच पैकी 3 एअर डिफेन्स सिस्टीमची डिलिव्हरी

या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहीलय की, भारत -रशिया सहकार्याला अधिक मजबूत करण्या संदर्भात सार्थक चर्चा झाली 2018 मध्ये भारत आणि रशिया दरम्यान 40 हजार कोटी रुपयांच्या डीलवर हस्तांक्षर झाले होते. त्या अंतर्गत भारताला एस-400 चे 5 स्क्वॉर्डन साल 2023 च्या अखेर मिळणार होते. मात्र भारताला आतापर्यंत 3 स्क्वाड्रन मिळालेले आहे.टाईम्सच्या बातमीनुसार आता चौथी स्क्वाड्रन पुढच्या वर्षीपर्यंत तर पाचवी स्क्वाड्रन साल 2027 पर्यंत मिळणार आहे.

एस-400 का आहे महत्वाचे ?

एस-400 च्या प्रत्येक एका स्क्वाड्रनमध्ये दोन मिसाईल बॅटरी असतात. त्यात 128 मिसाईल असतात. या मिसाईल 120, 200, 250 आणि 380 किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत. यासोबत लांबपल्ल्याचं रडार सिस्टीम आणि कोणत्याही हवामानात चालणारा ट्रान्सपोर्ट व्हेईकल देखील असते.भारतीय वायूसेनेत आधीच तीन एस-400 स्क्वाड्रन असून त्यांना चीन आणि पाकिस्तान विरोधात उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारत सीमेवर तैनात केलेले आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!