AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमान पाकिस्तानात उतरताच जेवणात मिसळलं विष… पाकचा विकृतीचा कळस; पाकिस्तानी लष्कर तणावात

भारत आणि पाकिस्तान यांच्या नात्यात कायमच तणाव बघायला मिळालाय. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये गेला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती.

भारतीय विमान पाकिस्तानात उतरताच जेवणात मिसळलं विष... पाकचा विकृतीचा कळस; पाकिस्तानी लष्कर तणावात
Indian Airlines plane
| Updated on: Oct 30, 2025 | 10:50 AM
Share

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावात राहिली आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने आपल्या वेळापत्रकानुसार मुंबईसाठी उड्डाण केली. या विमानात 83 पॅसेंजर आणि क्रू मेंबर उपस्थित होती. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानक हे विमान मुंबईऐवजी पाकिस्तानच्या दिशेने नेण्यात आले. पाकिस्तानी सरकार आणि तेथील लष्कराला या विमानाबाबत काहीच माहिती नव्हती. पायलटने गुपचूप कंट्रोलला मेसेज करत विमान पाकिस्तानात जात असल्याची माहिती दिली आणि एकच गोंधळ भारतात बघायला मिळाला. दोन्ही पायलटच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली होती. ही घटना 10 सप्टेंबर 1976 ची आहे.

उड्डाण केल्यानंतर विमान हे आपल्या निश्चित उंचीवर जाऊन पोहोचल्यानंतर चार जण अचानक विमानात उभी राहिली आणि कोणाला काही कळण्याच्या आत विविध कोपऱ्यात पसली. त्यामधील दोन जण थेट कॉकपिटमध्ये शिरले आणि त्यांनी कॅप्टन बीएन रेड्डी आणि सह-वैमानिक आरएस यादव यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली. विमान हाईजॅकर झाल्याचे ओरडण्यास त्यांनी सुरूवात केली आणि एकच गोंधळ उडाला.

कॅप्टन रेड्डी यांनी परिस्थिती चांगली हाताळत थेट गुपचूप एटीसीला मेसेज केला आणि सांगितले की, विमान हायजॅक झाले असून पाकिस्तानमध्ये उतरवले जातंय. हायजॅकरने हे विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्यासाठी पायलटवर दबाव टाकला.  मेसेज मिळताच भारताची सुरक्षा यंत्रणा हादरली आणि संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय सक्रिय झाले. त्यादरम्यानच इंडियन एअरलाइन्सचे विमान थेट कराचीत उतरले.

पाकिस्तानच्या कराची विमानतळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आणि पाकिस्तानी लष्कराने वेढा घातला. भारताने पाकिस्तानवर दबाव टाकत स्पष्ट केले की, एकाही प्रवाशाला काही झाले तर सोडणार नाही. यानंतर पाकिस्तानी लष्कराने हायजॅकर यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन देखील दिले. मात्र, ही पाकिस्तानने भारताच्या दबावापुढे चाल खेळली.

हायजॅकरला पाकिस्तानी लष्कराने इतके विश्वासात घेतले की, त्यांनी विमानातील हायजॅकरला बिर्यानी ज्यूस आणि  कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी पाठवले. विशेष म्हणजे त्यांनी देखील हे आनंदाने खाल्ले आणि तिथेच सर्वकाही फसले. बिर्याणीमध्ये आणि कोल्ड ड्रिंकमध्ये बेशुद्ध पडण्याच्या गोळ्या घातल्या होत्या. हे खाऊन हायजॅकर बेशुद्ध झाले आणि पाकिस्तान लष्कराने विमानाचा ताबा घेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारताचे हे विमान दुसऱ्यादिवशी अर्थात 11 सप्टेंबर 1976 ला सर्व प्रवाशांना विमानासह सुखरूप परत पाठवले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक