AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UNSC Membership : आता या मुस्लीम देशाने भारताला दिला पाठिंबा

भारताचे वर्चस्व आता जागतिक स्तरावर वाढले आहे. अनेक अरब देश भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढवत आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या देशांचा समावेश आहे. भारत करत असलेल्या मागणीला अनेक देश आता पाठिंबा देऊ लागले आहेत. मुस्लीम राष्ट्र भारताचे समर्थन करत असल्याने तिकडे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.

UNSC Membership : आता या मुस्लीम देशाने भारताला दिला पाठिंबा
| Updated on: Feb 24, 2024 | 2:36 PM
Share

saudi support India : भारताने गेल्या १० वर्षात अनेक देशांसोबत मैत्रीचे संबंध आणखी घट्ट केले आहेत. यामध्ये आखाती देशांचा देखील समावेश आहे. भारतासोबत व्यापार वाढवण्यासाठी अनेक देशांमध्ये चढाओढ लागली आहे. ज्यामध्ये सौदी अरेबिया, दुबई या सारख्या देशांचा समावेश आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने भारताला पुढे येऊन पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला देखील स्थान मिळावे यासाठी सौदी अरेबियाने भारताचे समर्थन केले आहे. यूएईकडून मिळालेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. परिषदेत सुधारणा करण्याचे आवाहन भारताने केले आहे. त्याला देखील सौदीने पाठिंबा दिला आहे.

सौदी अरेबियाकडून भारताला पाठिंबा

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा परिषदेत काही सुधारणांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यामध्ये दुहेरी मापदंड न ठेवता विश्वासार्हता असेल तर तसे करणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे.

गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीची मागणी करण्यात आली होती. पण याला अमेरिकेने व्हेटो केल्यानंतर सौदी अरेबियाने ही मागणी केली आहे. गाझामध्ये अमेरिकेने दुटप्पीपणा स्वीकारल्याचा आरोपही सौदीने केला आहे. उल्लेखनीय आहे की भारताने वारंवार UNSC च्या विस्ताराची मागणी केली आहे आणि पाच स्थायी सदस्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया आणि फ्रान्स हे UNSC चे पाच स्थायी सदस्य देश आहेत, ज्यांना P-5 राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

भारत स्थायी सदस्य नाही

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिका कंबोज यांनी म्हटले की, 188 सदस्य असलेल्या देशांवर केवळ पाच देश किती काळ राज्य करत राहणार हा प्रश्न आहे. हे बदलणे अत्यंत गरजेचे आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारत अद्याप सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आम्ही हे साध्य करू, पण ते इतक्या सहजासहजी होणार नाही. भारताला स्थायी सदस्य करण्यासाठी आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि फ्रान्सने देखील पाठिंबा दर्शवला आहे. पण चीनचा याला विरोध आहे.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.