AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा मोठा डाव, पाकिस्तानने स्वत:चाच फाडला बुरखा, शेवटी भर बैठकीत पाकचा थयथयाट, थेट..

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. याच संधीचा फायदा साधून पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता वाढवली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगामवर केला.

भारताचा मोठा डाव, पाकिस्तानने स्वत:चाच फाडला बुरखा, शेवटी भर बैठकीत पाकचा थयथयाट, थेट..
UNGA
| Updated on: Sep 28, 2025 | 2:47 PM
Share

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) भारताचा दबदबा बघायला मिळाला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतच पुढाकार घेऊन थेट ब्रिक्स देशांची बैठक घेतली. यासोबतच रशिया आणि भारत यांच्यातील खास मैत्री देखील जगाला बघायला मिळाले. रशियाने अमेरिकेच्या नाकावर टिच्चू भारताचे काैतुक करत म्हटले की, भारताने कोणासोबत भागीदारी करायची हे फक्त भारतच ठरवतो. एस. जयशंकर यांनी यादरम्यान पाकिस्तानचे थेट नाव न घेता मोठा टोला लगावत पाकिस्तानवर जोरदार टीका देखील केली. पाकिस्तानच्या दहशतवादावर त्यांनी भाष्य केले. स्वातंत्र्यापासून भारताला दहशतवादाचा मोठा धोका आहे, असे त्यांनी आपला भाषणात स्पष्ट म्हटले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य स्रोत त्याच देशाचा आहे. मुळात म्हणजे भारताला स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा मोठा धोका आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रतिनिधीने नाव घेऊन भारतावर थेट टीका केल्याचे बघायला मिळाले. मात्र, एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नव्हते. भारत हा पाकिस्तानला बदनाम करत असल्याचे पाकिस्तानच्या प्रतिनिधीने म्हटले.

यादरम्यान भारताने पाकिस्तानच्या आरोपांवर उत्तर देत म्हटले की, भारताने कोणाचेही नाव घेतले नाही. एक शेजारी देश सीमेपलीकडे दहशतवादाच्या आपल्या दीर्घकालीन पद्धतीची कबुली देत ​​आहे हे यावरून स्पष्ट होतंय. भारताच्या स्थायी मिशनचे सचिव रेंटला श्रीनिवास यांनी म्हटले, पाकिस्तानची विश्वासार्हता बोलते आणि त्यांच्या दहशतवादाचा परिणाम शेजारील देशांवरच नाही तर जगभर होतो.

भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला. मागील काही दिवसांपासून भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला कोडींत पकडत आहे. पाकिस्तानसोबत वाढलेली अमेरिकेची जवळीकता आणि टॅरिफच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दाैरा रद्द केला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने पाकिस्तानविरोधात मोठा डाव टाकला आणि पाकिस्तान त्यात फसला. भारताने पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादावर टीका केली होती. मात्र, पाकिस्तान त्यामध्ये फसला आणि त्यांनी भारताला उत्तर दिल्याने त्यांचा बुरखा फाडला गेल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.