AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Earth Water Research | पृथ्वीवरील पाणी बर्फाळ धूमकेतू आणि अवकाशातील धुलिकणांतून? ब्रिटिश संशोधकांचा दावा

समुद्रांची उत्पत्ती या जगाच्या बाहेर झाली होती, या कल्पनेला पाठबळ देणारे संशोधन ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या गटाने केले आहे. जपानी रोबोने 25143 इटोकावा (Itokawa) नावाच्या लघुग्रहावरुन पृथ्वीवर आणलेल्या कणांचा अभ्यास या गटाने केला आहे.

Earth Water Research | पृथ्वीवरील पाणी बर्फाळ धूमकेतू आणि अवकाशातील धुलिकणांतून? ब्रिटिश संशोधकांचा दावा
फोटो : NASA
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 12, 2021 | 9:38 AM
Share

मुंबई : बाह्य अवकाशातून पाहिल्यावर ग्रहाला निळा रंग देणारे पाणी पृथ्वीच्या (The Earth) पृष्ठभागाच्या तीन चतुर्थांश भाग व्यापते. परंतु युगानुयुगं जीवसृष्टीचे पोषण करणारा द्रव पाण्याचा स्त्रोत (Water) हा मुख्य वैज्ञानिक वादाचा विषय आहे. महासागरातील पाणी बर्फाळ धूमकेतू (Icy Comets) आणि अवकाशातील धुलिकणांतून तयार झाले, असा दावा नव्या संशोधनातून केला जात आहे.

पाण्याच्या उगमाबद्दल मतभिन्नता

काही संशोधकांचा युक्तिवाद आहे, की 4.5 अब्ज वर्षांपूर्वी धुळीचे ढग आणि वायूंचा संयुग झाल्यापासून पाणी जगात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अस्तित्वात आहे. मात्र काही शास्त्रज्ञांमध्ये याबाबत मतभिन्नता आहे. काही जणांच्या मते, पृथ्वी ही सुरुवातीच्या काळात कोरडी आणि निर्जल होती. परग्रहीय स्त्रोतांमधून बर्फ आणि पाण्याचा वर्षाव झाल्यावर मोठ्या कालावधीनंतर महासागर अस्तित्वात आले. यातून पृथ्वीला व्यापणारे 332,500,000 घन मैल पाणी तयार झाले, असा त्यांचा तर्क आहे.

बाह्य अवकाशातून महासागर निर्माण

समुद्रांची उत्पत्ती या जगाच्या बाहेर झाली होती, या कल्पनेला पाठबळ देणारे संशोधन ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या गटाने केले आहे. जपानी रोबोने 25143 इटोकावा (Itokawa) नावाच्या लघुग्रहावरुन पृथ्वीवर आणलेल्या कणांचा अभ्यास या गटाने केला आहे. त्यानंतर बाह्य अवकाशातून महासागर निर्माण झाल्याच्या संकल्पनेचे समर्थन केले जात आहे.

ग्लासगो विद्यापीठाचे ल्यूक डेली म्हणाले, “आपले महासागर सूर्यमालेतील इतर भागांतून आलेल्या पाण्यापासून निर्माण झाले आहेत, याचे पुरावे आम्ही अभ्यास केलेल्या धुलिकणातून मिळाले आहेत. पृथ्वीवरील किमान अर्धे पाणी आंतरग्रहीय धूलिकणातून फिल्टर झाले असल्याचे हे सूचित करते”

लघुग्रहातून परत आणलेल्या कणांमध्ये पाणी

डेली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 25143 इटोकावा लघुग्रहावरुन परत आणलेल्या धुळीच्या कणांचा अभ्यास करण्यासाठी अणू-प्रोब टोमोग्राफी वापरली. या विलक्षण तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना नमुन्यातील अणू एक-एक करुन मोजता येतात. अशाप्रकारे, लघुग्रहातून परत आणलेल्या कणांमध्ये पाण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे उघड झाले, असे शास्त्रज्ञांनी नेचर अॅस्ट्रॉनॉमी (Nature Astronomy) जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

हे पाणी बहुदा सूर्यापासून वाहणार्‍या कणांच्या प्रवाहामुळे म्हणजेच सौर वार्‍याने निर्माण केले असावे, असा डेली यांचा निष्कर्ष आहे. सूर्यमालेतील ढगांमध्ये तयार झाले हे कण सूर्यमालेतून तरंगणाऱ्या धुळीच्या ढगांमधील ऑक्सिजनच्या अणूंशी संपर्कात येऊन पाण्याचे रेणू तयार करतात, असंही डेली म्हणाले.

संबंधित बातम्या :

प्रतिकूल परस्थितीमध्ये जनावरांना ‘हे’ आहे पर्यायी खाद्य, योग्य नियोजनाद्वारे सकस आहार

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.