AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या खेड्यात गात सांगितले जाते आपले नाव, मुलांना जन्मतःच मिळतो सूर

या गावात जर आपण कुणालाही त्यांचे नाव विचारले तर ते सर्वजण सांगतो तसे नाव सांगत नाहीत, तर गात आपले नाव सांगतात. (In this village in India, singing is said to be our name, children get the tune from birth)

भारतातील या खेड्यात गात सांगितले जाते आपले नाव, मुलांना जन्मतःच मिळतो सूर
भारतातील या खेड्यात गात सांगितले जाते आपले नाव
| Updated on: Jul 09, 2021 | 4:07 PM
Share

नवी दिल्ली : ईशान्य भारत आपली संस्कृती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सात राज्य असणारा ईशान्य भारत अनेक गोष्टींमुळे खास आहे. ईशान्य भारतातील राज्य मेघालयामधील एक गाव याला अधिक खास बनवते. कोंगथोंगची राजधानी शिलाँगपासून 65 किमी अंतरावर हे गाव आहे. या गावात जर आपण कुणालाही त्यांचे नाव विचारले तर ते सर्वजण सांगतो तसे नाव सांगत नाहीत, तर गात आपले नाव सांगतात. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, मात्र हे मेघालयचे व्हिसिलिंग व्हिलेज म्हणून ओळखले जाते. (In this village in India, singing is said to be our name, children get the tune from birth)

मुलाची आई तयार करते सूर

गेल्या कित्येक शतकांपासून या गावातली लोकं अशीच नावे सांगत आहेत. या गावात राहणाऱ्या लोकांनी कोड म्हणून जिंगरवाई लवबेईचा वापर सुरू केला आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 700 आहे आणि युनेस्कोकडून या गावाला मोठ्या आशा आहेत. शतकानुशतके जुनी परंपरा जपण्यास मदत करण्यासाठी या समुदायाने युनेस्को व एका शाळेकडून आशा व्यक्त केली आहे.

कोंगथोंगमध्ये राहणारे समुदायाचे नेते 36 वर्षीय रोथेल खोंगस्ती यांनी एका मुलाखतीत याबाबत अधिक विस्ताराने सांगितले आहे. त्याने सांगितले की जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आईकडून त्याच्यासाठी एक सूर वापरला जातो. त्यानंतर प्रत्येक जण त्याला हाक मारताना याचा सूरात बोलतात. प्रथम मुलाची आई हा सूर तयार करते. यानंतर हा सूर समाजातील वडिलधाऱ्यांपर्यंत नेला जातो.

सूर कोणाची नक्कल असू नये

या गोष्टी ध्यानात ठेवल्या जातात की हा सूर दुसऱ्या कोणाच्या सूरासारखे किंवा नक्कल असू नये. जसजसे मूल मोठे होते तसतसे हे सूर त्याची ओळख बनते. जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा हा सूर त्याच्यासोबत जातो. गेल्या अनेक वर्षांपासून मेघालय या नाव ठेवण्याच्या खास परंपरेला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

या खेड्यासारख्याच दुसर्‍या कॅनरी गावाचा उल्लेख अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने केला होता, ज्याचा 2013 मध्ये या यादीत समावेश करण्यात आला होता. सन 2017 मध्ये, तुर्कीची ‘बर्ड भाषा’ देखील युनेस्कोने मान्य केली होती. आता मेघालयातील ही परंपरा समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे आता केवळ 700 लोक ही परंपरा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर सिल्बोमध्ये 22,000 लोक आणि तुर्कीची पक्षी भाषा 10,000 लोक फॉलो करीत आहेत. जिंगरवेई लॉवबेई कोणत्याही शाळेत शिकवले जात नाही.

कला संकटात सापडलेय

जिंजरवेई लॉवबेई कोंगथांगमधील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. ही भाषा त्यांच्या पूर्वजांचा आदर करण्याचा एक मार्ग आहे असे गावातील लोकांचे मत आहे. संशोधकांच्या मते, प्रत्येक वेळी जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा सूर हा आदर दर्शविण्याचा एक मार्ग आहे. लोक त्यांच्या पूर्वजांच्या सन्मानार्थ जिंगरवेई गातात. या परंपरेशी संबंधित अनेक प्रथा आहेत. ही परंपरा जिवंत आहे पण आता त्याबद्दल चिंता वाढत आहे.

जेव्हा नवीन पिढीचे मूल गाव सोडते तेव्हा ते उर्वरित लोकांसह ही परंपरा पाळत नाहीत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ते आपली संस्कृती विसरत आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार जर चांगली शिक्षण व्यवस्था असेल तर राज्यातच मुलांना शिक्षण मिळू शकेल. इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी खेड्यांतील मुले पूर्व खासी हिल्सवर जातात. केसरंग शाळा गावापासून 3 किमी अंतरावर आहे आणि ती माध्यमिक शाळा आहे. यानंतर, फक्त शिलॉंग हाच अभ्यासासाठी पर्याय उरला आहे. (In this village in India, singing is said to be our name, children get the tune from birth)

इतर बातम्या

‘प्लीज आता तिसरं बाळ नको म्हणू…’, करीनाच्या हातातील अल्ट्रासाऊंडचे फोटो पाहून चाहते पडले बुचकळ्यात!

BMW च्या दोन ढासू बाईक भारतात लाँच, लूक आणि फीचर्स पाहून प्रेमात पडाल

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.