AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात विष्णूची आवडती ‘ही’ वनस्पती लावा; आरोग्यासोबतच रखडलेली कामे होतील पूर्ण

घरात विष्णूची आवडती अन् पवित्र असणारी वनस्पती घरात लावल्याने अनेक फायदे होतात. या वनस्पतीमुळे रखडलेली कामे तर होतातच पण सोबतच आरोग्य सुधारण्यासही मदत होते. पाहुयात मग कोणती आहे ही चमत्कारीक वनस्पती.

घरात विष्णूची आवडती ‘ही’ वनस्पती लावा; आरोग्यासोबतच रखडलेली कामे होतील पूर्ण
| Updated on: Dec 23, 2024 | 12:42 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार वनस्पतींचेही अनेक फायदे सांगितलेले आहेत. त्यातील काही वनस्पती या आपल्या घरी नेहमी असाव्या असही सांगितलं जातं. घरात आणि आजूबाजूला झाडे लावणे शुभ मानले जाते. यामुळे अनेक फायदे होतात. यातील अनेक झाडे आणि वनस्पती अतिशय पवित्र मानल्या जातात. ज्यांची सनातन धर्मानुसार पूजाही केली जाते.

अशाच एका पवित्र वनस्पतीबद्दल आज जाणून घेणार आहोत. या वनस्पतीची घरामध्ये प्रतिष्ठापना करून विधीनुसार पूजा केल्यास चमत्कारी फायदे नक्कीच दिसून येतात. तसेच ही वनस्पती भगवान विष्णूला खूप प्रिय असल्याचही म्हटलं जातं.

या वनस्पतीचे नाव आहे कणेर. या वनस्पतीवर फुलणाऱ्या फुलांचा रंग पिवळा असून तो भगवान विष्णूंचा आवडता रंग मानला जातो तर. हे फूल देवी महालक्ष्मीलाही अतिशय प्रिय मानले जाते. जर आपण हे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावले तर ते सकारात्मकतेसोबतच सुख-समृद्धी आणते तसेच जीवनात शांतता राहते असं म्हटलं जातं.

कणेरचे रोप कोणत्या दिशेला लावायचे?

वास्तुशास्त्राच्या मते, घरामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुले देणारे कणेरचे रोप लावताना दिशा महत्त्वाची ठरते. यासाठी पूर्व किंवा पश्चिम दिशा शुभ मानली जाते. यापैकी कोणत्याही एका दिशेने तुम्ही हे रोप लावू शकता. घरामध्ये लाल रंगाची फुले देणारे कणेर रोप लावू नये. याची विशेष काळजी घ्या.

कणेर वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे

कणेर वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक फायदेही आहेत. जर तुम्हाला दाद, किंवा अॅलर्जी, अंगाला खाज येण्याची समस्या असेल तर तुम्ही कणेरचे मूळ गोमूत्रात चोळून लावल्याने केल्याने खाज येण्यापासून खूप आराम मिळतो.

जर एखाद्याला साप, विंचू किंवा इतर कोणताही विषारी किडा चावला असेल तर पांढऱ्या कणेरच्या मुळ चोळून लावल्यास. तात्काळ आराम मिळेल पण त्याचवेळी जवळच्या डॉक्टरांशीही संपर्क साधून उपचार घ्यायला विसरू नका.

शरीराच्या कोणत्याही भागात खाज येत असल्यास कणेरची पाने लवंगाच्या तेलात मिसळून शिजवा. यानंतर, मिश्रण थंड झाल्यावर खाज येत असलेल्या भागावर लावा. असे केल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

संपत्तीत होते वाढ

कणेरच्या झाडाला वर्षभर फुले राहतात. घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केल्याने घरात नेहमी धनसंपत्ती येते. इतकेच नाही, तर कणेरची वनस्पती घरातील वातावरण शांत ठेवते. याशिवाय घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवते. ते ठेवण्यासाठी योग्य दिशा पूर्व किंवा पूर्व-उत्तर कोन आहे. या दिशेला ठेवल्याने लक्ष्मीचा वास होतो. पिवळ्या फुलांचे कणेरचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच संपत्तीतही भरपूर वाढ होते. याचा वापर केल्याने शुभ कार्यात कोणताही अडथळा येत नाही असंही म्हटलं जातं.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.