.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याच दिवशी तिरंगाला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात एकच बदल झाला. तिरंग्यात सूत कात्याच्या जागी अशोक चक्र दाखविण्यात आले.

याच दिवशी तिरंगाला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख, जाणून घ्या संपूर्ण इतिहास
याच दिवशी तिरंगाला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 21, 2021 | 2:58 PM
Share

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात 21 जुलै हा दिवस महत्त्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला. यावेळी तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला. या दिवशी संविधान सभेने तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला आणि त्याला मान्यता दिली. 19व्या शतकात, जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, त्यावेळी देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यकर्त्यांकडून अनेक प्रकारच्या झेंड्यांचे प्रयोग केला जात होता. परंतु सन 1857 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली तेव्हा असा विचार केला जात होता की देशासाठी समान ध्वज आवश्यक आहे. तथापि काही लोकांचे म्हणणे आहे की, 22 जुलै 1947 रोजी तिरंगाला संविधान सभेने मान्यता दिली होती. (know the whole history of the national flag of india )

स्टार ऑफ इंडिया काय होता?

ब्रिटिश प्रतिकांवर आधारीत असलेला पहिला ध्वज स्टार ऑफ इंडिया म्हणून ओळखला जात असे. स्टार ऑफ इंडिया हा बर्‍याच ध्वजांचा एक गट होता जो ब्रिटिश शासकांनी येथे राज्य करत असताना प्रस्तावित केले होते. 20 व्या शतकाच्या शेवटी, एडवर्ड सातवाच्या कारकिर्दीत, ब्रिटीश शासित भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रतिकाची गरज भासू लागली. त्या काळी अस्तित्त्वात असलेल्या लोकप्रिय प्रतिकांमध्ये भगवान गणेश, काली माता यासारख्या प्रतीकांचा समावेश होता. परंतु हे सर्व ते एका विशिष्ट धर्मावर आधारीत आहेत असे सांगून नाकारले गेले.

बंगालच्या फाळणीने मिळाली नवी दिशा

वर्ष 1905 मध्ये बंगालची पहिली फाळणी झाली तेव्हा एक नवीन भारतीय ध्वज उदय झाला, जो देशातील लोकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. हा ध्वज वंदे मातरम् ध्वज म्हणून ओळखला जात असे. ब्रिटीश राजवटीविरूद्ध स्वदेशी चळवळीच्या वेळी त्याची सुरुवात झाली. ध्वजात आठ प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे आठ पांढरे कमळे व चिन्हे होती. हा ध्वज कोलकात्यात लाँच करण्यात आला होता. त्यास माध्यमात कुठल्याही प्रकारे जागा मिळाली नाही किंवा कोणत्याही वृत्तपत्रातही त्याचा उल्लेख नव्हता. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात हा ध्वज वापरण्यात आला.

जेव्हा गांधीजींना भेट दिला झेंडा

वर्ष 1921 मध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अधिवेशनात एका तरूणाने विजयवाड्यात झेंडा बनवून गांधीजींना दिला. हे दोन रंगांचे होते. लाल आणि हिरवा रंग जो दोन मोठ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम. यावेळी गांधीजींनी सूचना केली की, भारताच्या उर्वरित समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सफेद पट्टी आणि देशाची प्रगती सूचित करण्यासाठी चालता चरखा असावा.

तिरंगा कसा आला

1931 हे वर्ष राष्ट्र ध्वजाच्या इतिहासात संस्मरणीय असल्याचे म्हटले जाते. तिरंगा ध्वज देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ध्वजाने सद्य तिरंगाचा पाया तयार केला होता. हा ध्वज भगवा, पांढरा आणि मध्यभागी गांधीजींच्या चरखासह होता. त्यानंतर, 21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात एकच बदल झाला. तिरंग्यात सूत कात्याच्या जागी अशोक चक्र दाखविण्यात आले. (know the whole history of the national flag of india )

इतर बातम्या

Paytm चा वापर करुन सिलेंडर बुक करा आणि 900 रुपयांची डिस्काऊंट मिळवा

…तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, खबरदारीसाठी नागपुरातील 850 सराफांना नोटीस

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर