AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या या रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हीसा लागतो

तुम्हाला माहीती आहे का ? भारतीय रेल्वेचे एक रेल्वे स्थानक असे आहे की जेथे जाण्यासाठी आपल्या पासपोर्ट आणि व्हीसाची आवश्यकता लागते. या शिवाय येथे तुम्ही पाऊल देखील ठेवू शकत नाही.

भारताच्या या रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हीसा लागतो
railway
| Updated on: Jan 18, 2024 | 2:18 PM
Share

नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन मानले जाते. लांबपल्ल्यांच्या प्रवासासाठी रेल्वे देशातील सर्वात स्वस्त प्रवासाचे साधन आहे. देशभरात दररोज दोन कोटीहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी ट्रेनचे तिकीट किंवा पास काढणे पुरेसे असते. परंतू तुम्ही कधी असे ऐकले आहे का ? भारतीय रेल्वेच्या देशातील एका स्थानकात जाण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते. पासपोर्ट आणि व्हीसा शिवाय तुम्ही या स्थानकात प्रवेश देखील करु शकत नाही. पाहा कोणते हे रेल्वे स्थानक आहे ?

भारतीय रेल्वेच्या पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यात अटारी श्याम सिंह रेल्वे स्थानकात जाण्यासाठी व्हीसाची आवश्यकता लागते. तसेच या स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानच्या परवानगीची गरज लागते. तुम्हाला वाटेल की जर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेचे आहे. तर तेथे जाण्यासाठी पाकिस्तानच्या परवानगीची का आवश्यकता आहे ? याचे कारण म्हणजे अटारी रेल्वे स्थानकातून पाकिस्तानसाठी ट्रेन जाते. त्यामुळे या स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानाच्या परवानगीची गरज लागते. जर तुम्ही अटारी रेल्वे स्थानकात विना पासपोर्ट आणि व्हीसा शिवाय प्रवेश केला. तर पकडल्यानंतर तुम्हाला 14 फॉरेन एक्ट म्हणजे व्हीसाच्या इंटरनॅशनल हद्दीत बेकायदा शिरकाव केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अटक देखील होऊ शकते.

बंद झाले स्थानक

अटारी रेल्वे स्थानकातून एकमेव समझौता एक्सप्रेस चालत होती. या ट्रेनच्या तिकीटासाठी तुम्हाला पासपोर्ट दाखवावा लागतो. जर ही ट्रेन लेट झाली तर पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश रजिस्टरमध्ये ट्रेन एण्ट्री लिहीतात. 8 ऑगस्ट 2019 रोजी या रेल्वे स्थानकाला बंद करण्यात आले आहे. त्यानंतर समझौता एक्सप्रेसला देखील बंद करण्यात आले आहे. या समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ही ट्रेन बंद करण्यात आली आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान