AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुघलांच्या हरममध्ये का आणल्या जात होत्या परदेशातून सशक्त महिला?

अकबरनामा लिहणाऱ्या अबू फजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबरच्या हरममध्ये सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या.

मुघलांच्या हरममध्ये का आणल्या जात होत्या परदेशातून सशक्त महिला?
| Updated on: Aug 12, 2023 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली : जगातील काही देशांमध्ये मुघलांच्या हरमच्या सुरस कहाण्या आहेत. मुघलांच्या हरममध्ये काय चालते हे पाहण्यासाठी परदेशी लोकं भारतात येत होते. हरम बाबरच्या काळात सुरू झालं. हरमचा विस्तार अकबर या मुघल राज्यकर्त्याने केला. अकबरनामा लिहणाऱ्या अबू फजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबरच्या हरममध्ये सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या. यापैकी काही दास्या होत्या. या दास्या जगातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आणल्या गेल्या होत्या.

मुघल बादशहा आणि शहजाद्यांशिवाय हरममध्ये कुण्या दुसऱ्या व्यक्तीला एंट्री नव्हती. परंतु, फक्त दोन बाहेरच्या लोकांना एंट्री मिळाली होती. विदेशी यात्रा करणारे मनूची आणि फ्रांसीसी चिकित्सक फ्रांस्वा बर्नियर यांना. त्यांनी आपल्या आठवणींमध्ये हरममधील मुघलांचे अनेक राज खोलले आहेत.

धनुष्य भाला घेऊन सशक्त महिला

मुघलांच्या हरममधून निघणारी गोष्ट चर्चेचा विषय होत होती. विशेष म्हणजे हरमच्या सुरक्षेसाठी सशक्य महिलांची नेमणूक केली जात असे. हरममध्ये महिलांची तैनाती राहत होती. सुरक्षेचे तीन लेअर राहत होते.

सुरक्षेच्या पहिल्या लेअरमध्ये सशक्त आणि मजबूत महिला राहत होत्या. त्यांच्या हातात धनुष्य आणि भाले दिसत होते. हरमच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची राहत होती. विशेष म्हणजे या सशक्त महिला उजबेकीस्तानमधून आणल्या जात होत्या. तिथं महिलांना सैन्य प्रशिक्षण दिले जात होते. क्षणात शत्रूला पराभूत करण्याची क्षमता या प्रशिक्षित महिलांमध्ये राहत होती.

हरममध्ये किन्नरांचं काम काय

हरममधील सुरक्षेच्या दुसऱ्या लेअरमध्ये किन्नर सहभागी राहत होते. येथे होणाऱ्या षडयंत्रांवर लक्ष दिलं जातं होतं. गुप्त माहिती बादशहापर्यंत पोहचवली जात होती. किन्नरांचं हे काम होतं. बहुतेक किन्नर ऑफ्रिकी आणि आशियायी भागातील होते. कारण त्यांना लहानपणी घराबाहेर काढले जात होते. तुर्की आणि ऑफ्रिकेतील राजांना तोफा दिला जात होता. त्यांना राजकारभाराची माहिती राहत होती. त्यामुळे मुघलांच्या इतिहासात काही किन्नरांनी बाहशहाचे सल्लागार म्हणून काम केलं. आग्रा येथे बनवण्यात आलेल्या मकबऱ्यात बादशहासोबत किन्नरांचे कसे संबंध होते, हे सांगितले जाते.

सुरक्षेच्या तिसऱ्या लेअरमध्ये मजबूत काठीचे शिपाई राहत होते. हरमच्या समोर बंदूक ताणून हजर राहत होते. कोणताही दहशतवादी शिरल्यास गोळीबार करण्याचे त्यांना आदेश होते.

बादशहाला खूश करणारे नियम

मुघल बादशहाने हरमचे काही नियम तयार केले होते. त्यातून बादशहा आपल्या गरजा पूर्ण करत असे. त्यामुळे बादशहाशिवाय दुसऱ्या कुण्या पुरुषाला तिथं प्रवेश मिळत नसे. महिला असूनही तिथं बाहेरचा व्यक्ती प्रवेश करू शकत नव्हता. परंतु, मनुची आणि बर्नियर यांना हरममध्ये प्रवेश मिळाला. कारण ते व्यवसायाने चिकित्सक होते. याचा त्यांना फायदा झाला.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.