AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 टक्के तरुणींच्या नावाच्या शेवटी A किंवा I का येतं? बायको किंवा प्रेयसीचं नाव आठवून पाहा!

भारतीय महिलांच्या नावांच्या शेवटी A किंवा I येण्यामागचं कारण संस्कृत भाषेतील लिंगनिर्देशनाशी जोडलं आहे. संस्कृतमध्ये स्त्रीलिंगी शब्द बहुधा A ने संपतात. हिंदू मुलींची नावे स्वरांनी संपणे हा देखील एक प्रलित प्रकार आहे. मराठीसारख्या भाषांमध्ये, पुरुषनावांना A किंवा I जोडून स्त्रीलिंगी रूप निर्माण केले जाते.

90 टक्के तरुणींच्या नावाच्या शेवटी A किंवा I का येतं? बायको किंवा प्रेयसीचं नाव आठवून पाहा!
तुम्हाला माहीत आहे का याचं उत्तर ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 07, 2025 | 10:06 AM
Share

तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसेल किंवा तुमच्या लक्षात आली नसेल अशी एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बातमीची हेडिंग वाचून तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्यामुळे आपण आज याच टॉपिकवर विचार करणार आहोत. हे कसं घडतं? त्यामागचं लॉजिक काय? हे सर्व समजून घेणार आहोत.

आतापर्यंत तुम्ही अनेक महिलांना, मुलींना भेटला असाल. आई, बहीण, प्रेयसी, बायको, मैत्रीण आणि इतर महिलांना भेटला असाल. त्यांची नावेही तुमच्या तोंडपाठ असतील. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीय का? भारतीय महिलांच्या नावाच्या शेवटी A किंवा I येतात हे तुम्हाला माहीत आहे का? ए किंवा आयनेच महिलांची नावे संपतात हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. तुम्ही तुमची आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको किंवा ओळखीच्या कोणत्याही महिलेचं नाव आठवून पाहा. त्यांच्या नावाच्या शेवटचं अक्षर काय येतं ते पाहा. तुमच्याही ते लक्षात येईल. आणि आश्चर्यही वाटेल. जवळपास 90 टक्के महिलांच्या नावाचा शेवट A किंवा I ने संपतं. असं कसं होतं? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आणि असा प्रश्न मनात येणं रास्तही आहे.

नावाच्या शेवटी A येण्याचं हे आहे कारण…

भारतीय भाषा हिंदीचा उगम संस्कृतमधून झाला आहे. संस्कृतमध्ये महिलांना साधारणपणे अकारांत स्त्रीलिंगाने संबोधलं जातं. याचा अर्थ ए अक्षराने संपणारे शब्द आहे. त्यामुळेच तुम्हाला सर्वाधिक भारतीयांची नावे ए या अक्षराने संपुष्टात येत असल्याचं दिसेल. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्द एक परिभाषित संरचना असतो. त्याचा एक अर्थ असतो. कोणताही शब्द कुठेही जोडून किंवा तोडून एक पूर्वनिर्धारित अर्थाकडे घेऊन जातो.

म्हणून I येतं…

नावाच्या शेवटी आय येण्यामागेही कारण आहे. संस्कृतच्या नियमानुसार हिंदू मुलींची नावे स्वरांनी संपतात. उदा- i/ee – वाणी (Vani), मंदाकिनी (Mandakini), द्रौपदी (Draupadi) आदी.

असा झाला अरुणचा अरुणा

व्याकरणानुसार, मराठीत विशेष स्थितींमध्ये संज्ञा शब्दांमध्ये “आ” किंवा “ई/आय” जोडल्यास त्यांचं लिंग बदलू शकतं आणि ते महिला संज्ञा म्हणून वापरले जातात. याला लिंगांतर किंवा लिंगवृत्ती (Gender Transformation) असे म्हणता येईल.

उदाहरण :

तरुण (तरुण म्हणजे पुरुषाचा संदर्भ घेतो) मध्ये “आय” जोडल्यास तो तरुणी बनतो, जो एक महिला संबंधित शब्द होतो. अरुण (अरुण हे एक पुरुषाचे नाव आहे) मध्ये “आ” जोडल्यास तो अरुणा बनतो, जे एक महिला संबंधित नाव होते. अशाप्रकारे, मराठीत लिंगवृत्ती होण्यासाठी “आ” किंवा “आय” चा वापर अनेक वेळा केला जातो, जेव्हा एखाद्या पुरुष संज्ञेला महिलांच्या संदर्भात वापरायचं असतं.

Follow Us
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका.
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,....
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,.....
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.