AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद | गुंठेवारीची मुदत 31 मार्चपर्यंतच! आतापर्यंत किती संचिकांना मंजुरी? महापालिकेला किती मिळाले उत्पन्न?

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशानुसार, गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांना 31मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद | गुंठेवारीची मुदत 31 मार्चपर्यंतच! आतापर्यंत किती संचिकांना मंजुरी? महापालिकेला किती मिळाले उत्पन्न?
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 14, 2022 | 1:05 PM
Share

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) वतीने 31 डिसेंबर 2020 पूर्वी बांधण्यात आलेल्या मालमत्ता नियमित करून देण्यासाठी गुंठेवारीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत निवासी मालमत्ता नियमित (Property regularization) करून घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष सवलत देण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेअंतर्गत मालमत्ता नियमित करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले असून वेळोवेळी योजनेची मुदतही वाढवण्यात आली आहे. या गुंठेवारी योजनेची (Gunthewari scheme) अंतिम मुदत येत्या 31 मार्चपर्यंत असून आतापर्यंत महापालिकेने 5 हजारांवर मालमत्तांच्या संचिका मंजूर केल्या आहेत. या प्रक्रियेतून महापालिकेला 71 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे योजना?

राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी क्षेत्रातील मालमत्तांना वाजवी शुल्क आकारून त्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, औरंगाबाद महापालिकेने शहरात कार्यवाही सुरु केली. निवासी मालमत्तांसाठी रेडिरकनरलच्या पन्नास टक्के शुल्क तर व्यावसायिक मालमत्तांसाठी पूर्णपणे रेडिरेकनर दर आकारला जात आहे. नागरिकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, मात्र गुंठेवारीतील मालमत्तांनाच त्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळत आहे. महापालिका प्रशासनाकडे आतापर्यंत 7 हजार 366 संचिका दाखल करण्यात आल्या असून यापैकी 5 हजार 310 संचिकांना मंजुरी देण्यात आली आहे. तर विविध कारणांमुळे 322 संचिका नामंजूर करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सर्वाधिक 2 हजार 978 संचिका या वॉर्डक्रमांक 8 मधून प्राप्त झाल्या आहेत. शहरातील सुमारे दीड लाख मालमत्ता अधिकृत होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

31 मार्च अंतिम मुदत, 3 जूनपर्यंत प्रक्रिया

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशानुसार, गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांना 31मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंतच नागरिकांना प्रस्ताव दाखल करता येतील. ही शेवटची मुदतवाढ असेल. प्राप्त संचिकांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया ही पुढील 3 महिने म्हणजेच जूनपर्यंत सुरु राहील. नगररचना विभागातील अधिकारी पूर्णवेळ ही प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी घेतील. 90 दिवसांनी गुंठेवारी कक्षाचे काम संपुष्टात आणले जाईल, असे प्रशासकांनी सांगितले आहे.

इतर बातम्या-

बापरे! होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड, महाराष्ट्रातल्या गावातली 80 वर्ष जुनी परंपरा

फडणवीसांना कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही; दिलीप वळसे पाटीलांची स्पष्टोक्ती

Follow Us
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?