Farmer Protest | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ, कृषी कायद्यांच्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात

औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसनं कृषी कायद्याविरोधात आंदोलन केले. Aurangabad youth congress protest

Farmer Protest | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ, कृषी कायद्यांच्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:20 PM

औरंगाबाद: केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करत पंजाबचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीत सलग 12 व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळू लागलाय. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व कृषी कायद्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये युवक काँग्रेस मैदानात उतरलं आहे. (Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)

देशभरात कृषी विधेयकास मोठा विरोध पाहायला मिळत आहे. दिल्ली चलो आंदोलनांतर्गत दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसनं निदर्शनं केली. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसनं घोषणाबाजी केली. औरंगाबादमधील क्रांती चौक या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ घोषणाबाजी केली. (Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)

कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोल

केंद्र सरकार जोपर्यंत कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु राहील, असा इशारा युवक काँग्रेसनं दिला आहे. जोपर्यंत कायदे रद्द केले जाणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळेल, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला. (Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)

केंद्र सरकानं संसदेत कृषी विधेयक मांडण्यापासून ते मंजूर करेपर्यंत काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सातत्यानं कृषी कायद्यांवरुन नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील काँग्रेसने कृषी कायद्यांविरोधात करणारी लाखो पत्र पाठवली आहेत. काँग्रेसतर्फे विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलींचे आयोजन केले होते.

प्रियांका गांधींचा केंद्रावर निशाणा

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. ‘नव्या संसदेसाठी केंद्र सरकारचे 20 हजार कोटी रुपये आहेत. पंतप्रधानांसाठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी रुपये आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे 14 हजार कोटी रुपये नाहीत. 2017 पासून उत्तर प्रदेशात उसाचा भाव वाढला नाही. हे सरकार फक्त अब्जाधिशांपुरताच विचार करतं,’ असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केलाय.

संबंधित बातम्या:

कृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध

‘नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे,’ मात्र शेतकऱ्यांसाठी नाही? प्रियंका गांधींचा पंतप्रधानांना सवाल

(Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.