AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करा, भाजप नेते विनय नातूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करा, भाजप नेते विनय नातूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 30, 2020 | 9:49 PM
Share

रत्नागिरी : शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाकडून शिक्षण संस्थांना शिक्षकांना शाळेत बोलवू नये, असा आदेश पत्राद्वारे देण्यात आहे. या आदेशावर गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी आक्षेप घेतला आहे. नातू यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

“सर्वात जास्त पगारावरील खर्च असलेल्या शिक्षण विभागाचा कोविडच्या काळात वापर करायाचा सोडून शासन संघटनांच्या पत्राप्रमाणे निर्णय जारी करत आहे”, अशी टीका विनय नातू यांनी केली.

“2020 हे वर्ष संपत आलं, मात्र तरीही शिक्षण विभागाचे शिक्षणाविषयी धोरण अद्याप ठरत नाही. आर्थिक परिस्थिती नसतानाही ग्रामीण भागातील पालकांनी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून नवे अँड्रॉइड फोन घेतले आहेत. मुलांचे ऑनलाइन क्लास झालेत. पण अद्याप तिमाई, सहामाही परीक्षांचा पत्ता नाही”, असा टोला नातू यांनी लगावला.

“कोरोना संकट काळात अल्प मानधन घेणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी जर 100 टक्के उपस्थितीत काम करत असतील तर मुलांची शिक्षणाची सवय मोडू नये, यासाठी शालेय शिक्षकांनी शाळेत उपस्थित का राहू नये?”, असा सवालही विनय नातू यांनी केला.

हेही वाचा : उर्मिला मातोंडकरकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

Follow Us
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?