“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील आधीच्या वीज प्रश्नावरुन विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

आली-आली-आली, गेली-गेली-गेली, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 6:13 PM

पाटणा : बिहार निवडणूक पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा आज (26 ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार राजकीय भाषणं होत आहेत. त्यातच आता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील आधीच्या वीज प्रश्नावरुन विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. माझं शिक्षण बिहारमध्येच झालं आहे. तेव्हा 2 तास वीज असली तरी आम्ही म्हणायचो आली, आली, आली आणि तेवढ्यात लाईट जायची, असं जे. पी. नड्डा म्हणाले. ते बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये आयोजित सभेत बोलत होते (BJP president JP Nadda criticize lalu Prasad Yadav over electricity condition).

बिहारमधील वीज पुरवठ्याबाबत बोलताना जे. पी. नड्डा यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “‘मी बिहारमध्ये शिकलो आहे. तेव्हा दोन तास जरी वीज आली तरी आम्ही लोक म्हणायचो ‘आली…आली…आली… आणि असं म्हणतो ना म्हणतो तोच गेली…गेली…गेली. तेव्हा 24 तास वीज हा विचारही कुणी करु शकत नव्हतं.”

“15 वर्षांआधी बिहारमध्ये कोणतीही निवडणूक आली की जाती, धर्माची चर्चा व्हायची, समाजाला विभाजित करण्याच्या गोष्टी केल्या जायच्या. आताच्या निवडणुकीत मात्र आमचे उमेदवार विकासाच्या गोष्टी करत आहेत. सरकारच्या कामाची माहिती देतात. हा मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी राजकारणाचा चेहराच बदलला आहे,” असंही नड्डा म्हणाले.

हेही वाचा : 19 लाख 10 लाखापेक्षा मोठे की छोटे? चिदंबरम यांचा बिहारमधील नोकऱ्यांवरुन भाजपला सवाल

अराजकतावाले नोकऱ्या कशा देणार?

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिलेल्या नोकरीच्या आश्वासनावर टीका करताना नड्डा म्हणाले, “जे आज नोकरीचं आश्वासन देत आहेत ते बिहारमध्ये अराजकता पसरवणारे लोक आहेत. हे तर जे नोकरी करतात त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेणारे आहेत. गोपालगंजच्या दलित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पाटण्याला जात असताना गाडीच्या खाली उतरवून हत्या करण्यात आली इतपर्यंत अराजकता पोहचली होती. तेव्हा मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव होते. आज पोलीस महासंचालक आहेत ते तेव्हा पोलीस अधीक्षक होते. तेव्हा त्यांच्यांवर शहाबुद्दीनने गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, आता नितीश सरकारमध्ये शहाबुद्दीन तुरुंगात आहे.”

बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 जागांवर मतदान होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभांचा आणि भाषणांचा चांगलाच जोर होता.

हेही वाचा :

तेज प्रतापांकडे 15 लाखांची बाईक, राजद नेत्याकडे एक किलो सोनं, बिहारच्या उमेदवारांची डोळे विस्फारणारी संपत्ती

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

भाजपची सरकारे नसलेल्यांनी पुतीनकडून लस मागवायची का? शिवसेनेचा सवाल

BJP president JP Nadda criticize lalu Prasad Yadav over electricity condition

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.