AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात मोठे विधान; म्हणाले, ज्यांना लाभ मिळाला त्यांना…

सरकारी नोकऱ्यांमधील प्रवेशांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे का?' या कायदेशीर प्रश्नाचा आढावा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सुरुवात केली. त्यावेळी न्यायालयाने एक मोठे विधान केले.

आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात मोठे विधान; म्हणाले, ज्यांना लाभ मिळाला त्यांना...
Supreme CourtImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Feb 07, 2024 | 5:48 PM
Share

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : सरकारी नोकऱ्यांमधील प्रवेशांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे का?’ या कायदेशीर प्रश्नाचा आढावा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सात जणांच्या खंडपीठाने सुरुवात केली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती बीआर गवई, विक्रम नाथ, बेला एम त्रिवेदी, पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा यांचा समावेश आहे. घटनापीठाने सुनावणीच्या पहिल्या दिवशी ‘राज्यांना आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले. यासोबतच खंडपीठाने आणखी एक मोठे विधान केले.

सुप्रीम कोर्टाचे 7 न्यायाधीशांचे घटनापीठ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणे उप-वर्गीकरणास परवानगी द्यायची का? तसेच, राज्य विधानमंडळांना सराव करण्याची परवानगी द्यायची का या प्रश्नाचे परीक्षण करत आहे.

पंजाबचे ऍडव्होकेट जनरल गुरमिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन जातींसाठी विशेष तरतुदी करण्याचे कारण त्यांनी नमूद केले. जाती व्यवस्था आणि भेदभावामुळे समाजात खोलवर फूट पडली आहे. काही जाती उपेक्षित राहून निराशेच्या गर्तेत गेल्या आहेत. जे उपेक्षित आहेत ते मागासलेले आहेत. पुढे जाणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे अशा मागासलेपणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे गुरमिंदर सिंग म्हणाले.

मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, पंजाब सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. समानतेच्या कल्पनेमुळे राज्याला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी मागासवर्गीय व्यक्तींच्या तुलनेने मागासलेल्या वर्गाची ओळख पटवता येते का ते पहावे. संघराज्य संरचनेनुसार संसदेने संपूर्ण देशासाठी जाती आणि जमाती नियुक्त केल्या आहेत. तर, राज्यामधील जातींना आरक्षण देणे त्या त्या राज्यांवर सोडले आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी मागास जातीतील ज्यांना आरक्षणाचा हक्क होता आणि त्यांना त्याचा लाभही मिळाला आहे. त्यांनी आता आरक्षित प्रवर्गातून बाहेर पडावे. तसेच, मागासलेल्या लोकांसाठी मार्ग काढावा, या जाती बाहेर का काढल्या जाऊ नयेत? असे म्हटले.

काही उपप्रजातींनी विशिष्ट श्रेणीत चांगली कामगिरी केली. त्या श्रेणीत ते पुढे आहेत. त्यांनी यातून बाहेर पडून जनरलचा सामना करावा. जे अजूनही मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळू द्या. तुम्ही त्या आरक्षणातून बाहेर पडायला हवं असे स्पष्ट मतही न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी व्यक्त केलं.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...