AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समज

मॉर्निंग बॉकसाठी औरंगाबादच्या गोगाबाबा टेकडीवर हजारो नागरिकांची गर्दी उसळली आहे (Aurangabad Morning Walk).

औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समज
| Edited By: | Updated on: Aug 30, 2020 | 8:10 AM
Share

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी औरंगाबादच्या गोगाबाबा टेकडीवर हजारो नागरिकांची गर्दी उसळली आहे (Aurangabad Morning Walk). यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विनामास्क वॉक करणाऱ्यांना मास्कचा वापर करण्याची समज दिली (Aurangabad Morning Walk).

जिल्हाधिकाऱ्यांकडून ट्रेकिंग आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली. मास्क न वापरताच अनेकजण मॉर्निंग वॉक करत होते. त्यामुळे सुनील चव्हाण यांनी मास्क वापरण्यासाठी जागृती करत सूचक उपक्रम राबवला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल (29 ऑगस्ट) 313 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 911 झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 684 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 53, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 80 आणि ग्रामीण भागात 84 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी ठाण्यात पोलिसांनी गांधीगीरी करत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची आरती ओवाळली होती. लॉकडाऊनचं उल्लंघन करु नका असं वारंवार सांगूनही काही नागरिक नियमांचं पालन करत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी भर चौकात त्यांची आरती ओवाळत आगाऊ नागरिकांना धडा शिकला होता.

संबंधित बातम्या :

Corona | पुण्यात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 127 जणांवर गुन्हे, पोलिसांची कारवाई

Lockdown | विरारमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Lockdown : ठाणे पोलिसांची गांधीगिरी, मॉर्निंग वॉक करणाऱ्या आगाऊ नागरिकांची भर चौकात आरती

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.