ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ, मात्र आता कुठे दोन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर

परतीच्या पावसाने रब्बी हंगामाची वाट लावली आहे. मात्र सरकारने आता खरीप 2019 च्या हंगामात राज्यातील केवळ 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ, मात्र आता कुठे दोन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 11:01 AM

उस्मानाबाद : राज्यभरात ओला दुष्काळाची (Drough in two talukas) मागणी होत असताना, राज्य सरकारने आता कुठे उन्हाळ्यात चटके सोसलेल्या तालुक्यात दुष्काळ (Drough in two talukas) जाहीर केला आहे. परतीच्या पावसाने रब्बी हंगामाची वाट लावली आहे. मात्र सरकारने आता खरीप 2019 च्या हंगामात राज्यातील केवळ 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात गंभीर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने लेखी आदेश काढत दुष्काळी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

दुष्काळ जाहीर केल्यामुळे या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट, शेतीशी निगडीत कर्जवसुलीस स्थगिती, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीचे शैक्षणिक शुल्क माफ , रोहयोच्या कामात काही निकषात शिथिलता देऊन कामे सुरू, गरजेनुसार टँकर, शेतीच्या पंपाची वीज खंडीत न करणे, पीक कर्ज पुनर्गठनसह अन्य उपाययोजना आणि सवलती सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांत मध्यान्ह भोजन योजना सुद्धा दीर्घ मुदतीसाठी राबविण्यात येणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना कृषी विषयक मदतीसाठी  निविष्ठा अनुदान देण्यात येणार असून हा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमानाची तूट, उपलब्ध भूजल कमतरता, पेरणी खालील क्षेत्र आणि पीक स्तिथीचा विचार करुन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात एकीकडे सर्वत्र दुष्काळाची गंभीर स्थिती असताना केवळ 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाचे संकट असतानाच परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूससह अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.