AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळाचा जबर फटका, रब्बीची पेरणी निम्म्याने घटली

गजानन उमाटे, टीव्ही ९ मराठी, नागपूर: राज्यात यंदा 180 तालुक्यात दुष्काळ आहे. या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका रब्बीच्या पेरणीला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा निम्मा पेरा घटला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरपर्यंत अवघ्या 27 टक्केच क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वात चिंताजनक म्हणजे अपुरा पाऊस आणि जमिनीत ओलावा नसल्याने डाळवर्गीय पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात […]

दुष्काळाचा जबर फटका, रब्बीची पेरणी निम्म्याने घटली
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

गजानन उमाटे, टीव्ही ९ मराठी, नागपूर: राज्यात यंदा 180 तालुक्यात दुष्काळ आहे. या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका रब्बीच्या पेरणीला बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा निम्मा पेरा घटला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरपर्यंत अवघ्या 27 टक्केच क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वात चिंताजनक म्हणजे अपुरा पाऊस आणि जमिनीत ओलावा नसल्याने डाळवर्गीय पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे राज्यात यंदा डाळींचं उत्पादन घटणार आहे. कृषी विभागाच्या रब्बी पेरणीचा अहवाल ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे.

राज्यात 56 लाख 93 हजार रब्बीचं क्षेत्र आहे, पण यंदा दुष्काळामुळे 20 नोव्हेंबरपर्यंत अवघ्या 15.51 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात सर्वात भीषण परिस्थिती असून, औरंगाबाद विभागात अवघी 15 टक्केच पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी 20 नोव्हेंबरपर्यंत राज्यात रब्बीची 55 टक्के पेरणी झाली होती, त्या तुलनेत यंदा रब्बीची पेरणी अवघी 27 टक्केच झाली आहे. ही पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. राज्यात कडधान्याचं क्षेत्र 16 लाख हेक्टर आहे, त्यापैकी अवघ्या 6 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.

डाळिंच्या एकूण उत्पादनापैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन हे रब्बीत घेतलं जातं.  पण यंदा दुष्काळामुळे डाळवर्गीय पिकांची पेरणी घटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम आहे. यंदा 180 तालुक्यात दुष्काळ असल्यानं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय या दुष्काळाने आता रब्बीचा आधारही हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या भीषण संकटात आहे, अशा स्थितीत कागदी घोड्यांचा खेळ न खेळता सरकारनं युद्ध पातळीवर उपाययोजना करुन शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.