AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचं निदान 5 मिनिटात, रॅपिड टेस्टला मान्यता : राजेश टोपे

ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope On Corona) यावेळी म्हणाले.

कोरोनाचं निदान 5 मिनिटात, रॅपिड टेस्टला मान्यता : राजेश टोपे
| Updated on: Apr 02, 2020 | 3:42 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत (Health Minister Rajesh tope On Corona) आहे. “राज्यात 5 हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व राज्याच्या (Health Minister Rajesh tope On Corona) मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व राज्याच्या मंत्र्यांना मार्गदर्शन केलं

“मोदींनी दिलेल्या सूचनांची अंमलवजावणी आपण महाराष्ट्रात आता तर करतो आहोत, पण पुढे आणखीन चांगल्याप्रकारे करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विशेष म्हणजे टेस्टिंगचा. दर दिवसाला पाच हजार टेस्ट होऊ शकतात एवढी क्षमता राज्यभराची आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल,” असे राजेश टोपे म्हणाले.

रॅपीड टेस्टचा म्हणजे काय?

“रॅपीड टेस्टचा अर्थ असा आहे की, ब्लड घेतल्यावर पाच मिनिटात आपल्या शरीरात अॅन्टीबॉडीज तयार झालेले आहेत का त्याच्या प्रमाणावरुन संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन आहे का ते समजणार आहे. यावरुन लोकांच्या संख्येचे प्रमाण कळलं तर त्याला लगेच क्वारंटाईन किंवा आयसोलेट करता येईल आणि त्यांच्यावर उपचार करता येईल,” असेही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.

“युद्धापेक्षाही मोठी समस्या आहे. सर्वांनी टीमवर्कने एकत्र येऊन सामोरं जायला पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

“त्याशिवाय त्यांनी सर्व्हेलंस म्हणजे ट्रेसिंग तपासणी करणं यावरही जोर दिला. आपण जे थ्री टी प्रिसिंपल म्हणतो त्यामध्ये ट्रेसिंग, ट्रकिंग करणं, टेस्टिंग करणं आणि ट्रिटमेंट करणे, याचा समावेश आहे. यामध्ये ट्रेसिंग करण्याचा जो भाग आहे त्यावर अधिक भर देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये सर्व्हेलंस जो करायचा आहे ते म्हणजे जो पॉझिटिव्ह सापडला आहे त्याला क्वारंटाईन करायचं आहे,” असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

“त्यासाठी गरज पडली तर त्याचे कंटेनमेट झोन आपण जो हॉटस्पॉट म्हणतो, अशा ठिकाणी चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये ड्रोन टेक्नॉजी किंवा डिजीटल माध्यमातून मोबाईल फोन किंवा जीपीएस बॅन्डसुद्धा बांधला तरी ज्या लोकांना क्वारंटाईन केलं आहे त्यांच्या लोकेशनची माहिती मिळेल. त्यांनी जनमानसात फिरु नये यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, असं मोदींनी सांगितलं,” अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“ट्रिटमेंटच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रात डेडीकेटेड हॉस्पिटल प्रत्येक जिल्हा्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदरच हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्क्लुझिव्ह कोव्हीड 19 रुग्णालये म्हणून नेमली आहेत. फक्त कोरोनाबाधित रुग्णांसाठीच ते हॉस्पिटल असणार आहेत. अशा स्वरुपाचे हॉस्पिटल असावेत असा आग्रहच केंद्र सरकारने केला आहे. त्या दृष्टीकोनाने आपल्या राज्याची तयारी आहे,” असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगिले.

“जिथे जास्त संख्या आहेत तिथे खूप स्ट्रिक्ट कर्फ्यू किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हायला हवं,” असेही काही सल्लेही पंतप्रधान मोदींनी दिले.

“देशात युद्धापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. सर्वांनी टीमवर्कने एकत्र येऊन सामोरं जायला पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केली आहे. तशाचप्रकारे  तयारीही करावी अशा सूचना पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या.”

“सोशल डिस्टन्सिंगमध्ये तडजोड नाही. मुंबईतील 146 ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. हॉटस्पॉट आहेत तिथे कलम 144 लागू केले आहे. तसेच अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करणार आहोत,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope On Corona) म्हणाले.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत...

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..