मोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका

जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्याबाहेरील व्यक्तीही जमीन खरेदी करु शकणार आहेत. | Omar Abdullah

मोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 10:07 PM

श्रीनगर: मोदी सरकारने जमीन खरेदी कायद्यात सुधारण करून जम्मू-काश्मीर विकायला काढलाय, अशी खरमरीत टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जम्मू-काश्मीरमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारासंबंधीच्या नियमांत करण्यात आलेल्या सुधारणांचा त्यांनी निषेध केला. (Omar Abdullah on Kashmir amendment in land laws)

हे बदल अस्वीकारार्ह आहेत. बिगरशेती जमिनींसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) देण्याचीही गरज नाही. तर कृषी जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. एकूणच केंद्र सरकारने आता जम्मू-काश्मीर विकायला काढला आहे. त्यामुळे आता लहान जमिनीच्या मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, अशी टीका ओमर अब्दुल्ला यांनी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्याबाहेरील व्यक्तीही जमीन खरेदी करु शकणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या अधिनियमानुसार आता जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिकांना कारखाना, घर किंवा दुकानासाठी जमीन खरेदी करता येईल.

केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी काळात काश्मीरमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांनाच राज्यात जमीन खरेदी करता येत असे. मात्र, आता बाहेरच्या लोकांनाही याठिकाणी जमीन घेण्याची परवानगी मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारचे मोठे निर्णय पंतप्रधान मोदी यांनी धाडसी निर्णय घेत गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा दिला जात नाही तोपर्यंत मी तिरंगा हातात धरणार नाही, असे वक्तव्य ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय. या वक्तव्याचा निषेध करत ‘पीडीपी’च्या तीन प्रमुख नेत्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला.

संबंधित बातम्या:

‘देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा

लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजप विजयी, पण काँग्रेसला फायदा!

(Omar Abdullah on Kashmir amendment in land laws)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....