AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला; विष्णूपुरी धरणाचे 10 दरवाजे उघडले!

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव या गावचा संपर्क तुटला आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला; विष्णूपुरी धरणाचे 10 दरवाजे उघडले!
नांदेडमध्ये मुसळधार पाऊस...!
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 10:00 AM
Share

नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके वाहून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले असून शेलगावसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरले असून विष्णूपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 80 मंडळात जोरदार पाऊस…!

नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊसाने ऊसंत न घेता नांदेड जिल्ह्यास झोडपून काढले. मागील 24 तासात जिल्ह्यातील 80 महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहिती नुसार जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता दाट आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अर्धापूर महसूल मंडळात 123 मिमीची नोंद..!

आज पहाटे (7 सप्टेंबर) जिकडे तिकडे चोहीकडे पाऊसाच्या धारा आणि पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक अर्धापूर महसुल मंडळात 123 मिलीमीटर तर भोकर 105 मिलीमीटर, मनाठा 104 मिलीमीटर, तळणी 97 मिलीमीटर, पिंपरखेड 84 मिलीमीटर, आष्टी 77 मिलीमीटर, धर्माबाद आणि शेवडी प्रत्येकी 75 मिलीमीटर, तामसा 72 मिलीमीटर, हिमायतनगर आणि निवघा प्रत्येकी 68 मिलीमीटर, किनवट 62 मिलीमीटर, कापशी 58 मिलीमीटर, बिलोली 55 मिलीमीटर, मुखेड 52 मिलीमीटर, कलंबर 47 मिलीमीटर, नायगाव, हदगाव आणि सोनखेड प्रत्येकी 45 मिलीमीटर, कंधार आणि लोहा प्रत्येकी 40 मिलीमीटर, माळाकोळी 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याकडून 3-4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात कुठं कुठं पावसाचा अंदाज?

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर परिणाम होत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे. मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

(maharashtra nanded heavy Rain some Village Loss Contact Vishnupuri Dam overflow)

हे ही वाचा :

Ratnagiri Rain | दापोलीच्या इतिहासातील थैमान घालणारा पाऊस, चिपळूणमध्येही 16 तासापासून मुसळधार, सतर्कतेचा इशारा

चिपळूणमध्ये भरतीच्या वेळी शहरात पुन्हा पाणी भरण्याची शक्यता, नगरपालिकेकडून मदतीसाठी संपर्क क्रमांक जाहीर

मुंबईसह राज्यभर पावसाचा जोर वाढणार; विजांच्या कडकडाटासह हजेरी लागणार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.