AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचे 44 भाविक तेहरानमध्ये अडकले

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. अशातच महाराष्ट्रातील 44 भाविक इराणमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचे 44 भाविक तेहरानमध्ये अडकले
| Updated on: Feb 29, 2020 | 12:02 PM
Share

सोलापूर : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. अशातच महाराष्ट्रातील 44 भाविक इराणमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे (Maharashtrian tourist stuck in Iran). यात सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या भाविकांचा समावेश आहे. यामुळे भाविकांच्या कुटुंबीयांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. तसेच सरकारकडे लवकरात लवकर त्यांना परत आणण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.

इराणमध्ये धार्मिक तीर्थयात्रेला गेलेले जवळपास 2 हजार मुस्लीम भाविक तेहरानजवळ अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील 44 भाविकांचा समावेश आहे. यानंतर या प्रवाशांची तेथून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी धडपड सुरु आहे. भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून इराणमधील विमानांना भारतात उतरण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे सर्व भाविक मागील 8 दिवसांपासून तेहरान परिसरात अडकून पडले आहेत.

अकलूज, सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागातील 44 भाविक कोल्हापूर येथील साद ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे धार्मिक यात्रेसाठी गेले. त्यांनी 21 फेब्रुवारीला मुंबई येथून तेहरानला उड्डाण केले. मात्र, कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्याने या भाविकांना तेहरानमध्येच अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर काय उपाय केला जातो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारताने एअर इंडियाच्या मदतीने कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या चीनमधून अनेक भारतीय नागरिकांना स्वदेशात आणले आहे. अशावेळी इराणमधील महाराष्ट्रीय भाविकांना परत आणण्याबाबत परराष्ट्र खात्याकडून अद्याप पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संबंधित भाविकांचे कुटुंबीय मात्र, काळजीत पडले आहेत.

Maharashtrian tourist stuck in Iran

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.