AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवी मुंबईतील स्मारकाचं लोकार्पण, स्मारक जीवनप्रवास उलगडणार

हे स्मारक पाहण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून ठरेल, असा विश्वास राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोलीत व्यक्त केला आहे.

Navi mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवी मुंबईतील स्मारकाचं लोकार्पण, स्मारक जीवनप्रवास उलगडणार
eknath shinde
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 6:15 PM
Share

नवी मुंबई :  नवी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असावे यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला होता. या मागणीची दखल घेऊन महानगरपालिकेने स्मारकाचा ठराव तयार केला. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 1 नोव्हेंबर 2017 मध्ये करण्यात आले, परंतु यानंतरही अंतर्गत सजावटीची कामे अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना पूर्ण स्मारक पाहता येत नव्हते. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

काम पूर्ण होत आले असताना लोकार्पण

स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. काम पूर्ण होत आले असून त्याआधीच लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्तेच्या बाबतीत फार मोठी उंची होती. त्यांचे नवी मुंबईतील ऐरोलीत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले भव्य स्मारक प्रशंसनीय आहे. त्यामुळे हे स्मारक पाहण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून ठरेल, असा विश्वास राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोलीत व्यक्त केला आहे.

बाबासाहेबांची पुस्तके, पत्रं वाचायला मिळणार

बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तके लिहिली आहेत, तसेच त्यांची दुर्मीळ पत्रे या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतात, संगणकीय लायब्ररी, तसेच बाबासाहेबांचा संपूर्ण बालपणापासूनचा जीवन प्रवास यात आहे. त्यांचे दुर्मीळ क्षणसुद्धा पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे त्यांचा जीवनपट जवळून पाहता येईल, हे स्मारक सर्वांना प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहे. असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Best Astro Tips:पैशांची चणचण भासतेय, मग ज्योतिषशास्त्रातील हे उपाय नक्की करुन बघा

Bengal Triple Murder: मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या, एकाला अटक

Good News| ऐतिहासिक येवला मुक्तीभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा; महापरिनिर्वाण दिनी सरकारची मोठी घोषणा

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.